
मिसळपाव @ सटाणा डॉट कॉम...
आमचा जुना दोस्त सचिन बाबुलाल फुलपगारे याचं लग्न नुकतंच धुळ्यातल्या साक्री इथं पार पडलं. हैदराबादपासनं (ई टीव्ही) आम्ही एकत्र (रुममेट) असल्यामुळं त्याच्या लग्नाला मी जाणारच होतो. आमचे प्रमुख अशोक सुरवसे, मी, दुर्गेश सोनार, अमोल परांजपे आणि ई टीव्हीतला जुना सहकारी संदीप साखरे असे आम्ही सर्व साक्रीसाठी निघालो. सर्वच जण खवय्ये असल्यामुळे ट्रीपला एक वेगळीच मजा आली. झकास. यापूर्वी अनेक ठिकाणी मित्रांबरोबर गेलो होतो. पण साक्री म्हणजे साक्री...
बेलापूरहून निघालो ते बदलापूरला वैभव नावाच्या एका ढाब्यावर थांबलो होतो. तिथं खान-पान उरकल्यानंतर आम्ही नाशिकच्या दिशेनं रवाना झालो. मुंबई-नाशिक महामार्गावर दोन ठिकाणी चहासाठी थांबल्यानंतर मग थेट नाशिक गाठलं. जुन्या सीबीएस बाहेरच्या चहाच्या गाडीवर मस्त दोन कप चहा मारल्यानंतर मग साक्रीच्या दिशेनं रवाना झालो.
साधारण साडेसातच्या सुमारास सटाणा (बागलाण) इथं पोचलो. तिथं चहा घ्यावा आणि मग पुढे जावं असा विचार होता. तिथं पोचल्यानंतर `झंकार` नावाच्या एका छोट्या हॉटेलसमोर गाडी थांबली. तिथं सकाळच्या नाश्त्याची तयारी सुरु होती. मिसळ, पोहे आणि बटाटे वडे असा मेन्यू तयार होत होता. मग काय, फक्त चहावर थांबणं शक्यच नव्हतं. जे काही पहिल्यांदा तयार होईल, त्यावर ताव मारुन मगच गाडी बाहेर काढायची असं ठरलं.
मिसळीसाठी आवश्यक मसाला आणि तर्री तयार करताना पाहिल्यानंतर भूक आणखी चाळवली जात होती. आदल्यादिवशी ब-यापैकी रेटलं होतं. तरीपण सक्काळी सक्काळी कडकडून भूक लागली होती दहा-पंधरा मिनिटं कळ काढल्यानंतर पोहे आणि मिसळ तयार झाली.
सुरवातीला प्रत्येकानं एक-एक मिसळ आणि पाव घेण्याचं ठरवलं पोहे, शेव, पातळ पोह्याचा चिवडा आणि या सर्वांवर मटकीच्या उसळीचा रस्सा व्वा.. व्वा... पुण्यातल्या तमाम मिसळवाल्यांच्या तोडीस तोड मिसळीचा आस्वाद घेताना स्वर्गीय सुखाचा आनंद होत होता. मिसळ इतकी झणझणीत होती की, घाम निघत होता. पण तरीही दोनदा रस्सा घेण्याचा मोह मी टाळू शकलो नाही. पुणेकरांना लाजवतील इतक्या पाट्या `झंकार`मध्ये होत्या. त्यातली एक पाटी अशी होती की, रस्सा पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पण कदाचित आम्ही बाहेरगावाहून आल्यामुळं आम्हाला पुन्हा पुन्हा रस्सा देताना त्यानं का-कू केलं नाही. फक्त रस्साच नाही तर कांदा, शेव आणि लिंबूही त्यानं दोन-तीनदा फिरवलं.
मिसळ इतकी झक्कास होती की, सुरवातील फक्त पोहे खाण्याची तयारी दर्शवणा-यांनाही मिसळ खाण्याचा मोह आवरत नव्हता. मिसळीचा पहिला राऊंड होईपर्यंत पोहे तयार झाले होते. मग काय, सर्वांनी पोह्यांकडे मोर्चा वळवला. पोहे पण लय भारी होते. पोहे करताना झणझणीत ठेच्याप्रमाणेच त्यामध्ये लिंबू आणि साखरेची चव जाणवण्यासारखी होती. त्यामुळे त्याला अगदी (माझ्या) घरच्या पोह्यांसारखी चव आली होती. पोहे आणि मटकीचा रस्सा हे अफलातून कॉम्बिनेशन वेड लावणारं होतं. पोह्यांचा पहिला राऊंड झाल्यानंतर मी आणि संदीपनं दोघात एक प्लेट पोहे मागवले. (किती खाल्लं त्याचा विचार केला की, अगदी कसं कसं होतं.)
आणखी सांगायची (किंवा न सांगण्यासारखी म्हणाल तर अधिक उत्तम.) गोष्ट अशी की, त्याठिकाणी आमच्या पोह्याच्या दोन प्लेट संपल्यानंतर `झंकार`चा आचारी वडे काढयला घेत होता. बटाटे स्मॅश करुन त्यामध्ये घालण्यासाठी मिरच्या आणि इतर मसाला तयार करत होता. पोहे संपल्यानंतर आम्हाला खरं तर तिथला वडा टेस्ट करायचा होता. त्यामुळे चहा पिऊन होईपयर्यंत जर वडे काढले तर एक-एक वडा टेस्ट करु, असं ठरलं. पण दुर्दैवानं आम्ही तिथून निघेपर्यंत वडे निघाले नव्हते. सो बॅड ना...
इतकं सगळं रेटल्यानंतर चहा हवाच. `झंकार`समोरच योगेश्वर टी` नावाची एक छोटीशी चहाची टपरी होती. साध्या चहापेक्षा स्पेशल चहा मागवला. काहीसा कडक आणि कमी गोड ही माझ्या स्पेशल चहाची व्याख्या. माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगला चहा मला तिथं मिळाला. दुधात पाणी मिसळलं नसल्यानं म्हणजेच फक्त दूध वापरुन चहा केल्यामुळं त्याची चव आणखीनच चांगली लागत होती चहा चांगला असल्यामुळं आणखी एका स्पेशल मागवला.
मिसळ-पाव, दीड-दोन प्लेट पोहे आणि मग फक्कड चहा घेतल्यानंतर आम्ही साक्रीच्या दिशेनं निघालो... सचिनच्या लग्नामध्ये अस्सल खान्देशी मेन्यू असेल असा विचार मनात ठेवून. संस्कृतमध्ये एक म्हणच आहे की, `मिष्टान्न इतरे जनः` अर्थात, लग्नामध्ये जेवण काय आहे, गोड काय आहे, यामध्येच बहुतेकांना रस असतो. त्यानुसार आम्हालाही तिथल्या जेवणाबद्दल उत्सुकता होतीच.
तुम्ही जर कधी सटाण्याला गेलात तर एस. टी. स्टॅण्डच्या अलिकडे असलेल्या (किंवा पेट्रोल पंपासमोर असलेल्या) झंकार आणि योगेश्वर या स्टॉल्सला नक्की भेट द्या.
आमचा जुना दोस्त सचिन बाबुलाल फुलपगारे याचं लग्न नुकतंच धुळ्यातल्या साक्री इथं पार पडलं. हैदराबादपासनं (ई टीव्ही) आम्ही एकत्र (रुममेट) असल्यामुळं त्याच्या लग्नाला मी जाणारच होतो. आमचे प्रमुख अशोक सुरवसे, मी, दुर्गेश सोनार, अमोल परांजपे आणि ई टीव्हीतला जुना सहकारी संदीप साखरे असे आम्ही सर्व साक्रीसाठी निघालो. सर्वच जण खवय्ये असल्यामुळे ट्रीपला एक वेगळीच मजा आली. झकास. यापूर्वी अनेक ठिकाणी मित्रांबरोबर गेलो होतो. पण साक्री म्हणजे साक्री...
बेलापूरहून निघालो ते बदलापूरला वैभव नावाच्या एका ढाब्यावर थांबलो होतो. तिथं खान-पान उरकल्यानंतर आम्ही नाशिकच्या दिशेनं रवाना झालो. मुंबई-नाशिक महामार्गावर दोन ठिकाणी चहासाठी थांबल्यानंतर मग थेट नाशिक गाठलं. जुन्या सीबीएस बाहेरच्या चहाच्या गाडीवर मस्त दोन कप चहा मारल्यानंतर मग साक्रीच्या दिशेनं रवाना झालो.
साधारण साडेसातच्या सुमारास सटाणा (बागलाण) इथं पोचलो. तिथं चहा घ्यावा आणि मग पुढे जावं असा विचार होता. तिथं पोचल्यानंतर `झंकार` नावाच्या एका छोट्या हॉटेलसमोर गाडी थांबली. तिथं सकाळच्या नाश्त्याची तयारी सुरु होती. मिसळ, पोहे आणि बटाटे वडे असा मेन्यू तयार होत होता. मग काय, फक्त चहावर थांबणं शक्यच नव्हतं. जे काही पहिल्यांदा तयार होईल, त्यावर ताव मारुन मगच गाडी बाहेर काढायची असं ठरलं.
मिसळीसाठी आवश्यक मसाला आणि तर्री तयार करताना पाहिल्यानंतर भूक आणखी चाळवली जात होती. आदल्यादिवशी ब-यापैकी रेटलं होतं. तरीपण सक्काळी सक्काळी कडकडून भूक लागली होती दहा-पंधरा मिनिटं कळ काढल्यानंतर पोहे आणि मिसळ तयार झाली.
सुरवातीला प्रत्येकानं एक-एक मिसळ आणि पाव घेण्याचं ठरवलं पोहे, शेव, पातळ पोह्याचा चिवडा आणि या सर्वांवर मटकीच्या उसळीचा रस्सा व्वा.. व्वा... पुण्यातल्या तमाम मिसळवाल्यांच्या तोडीस तोड मिसळीचा आस्वाद घेताना स्वर्गीय सुखाचा आनंद होत होता. मिसळ इतकी झणझणीत होती की, घाम निघत होता. पण तरीही दोनदा रस्सा घेण्याचा मोह मी टाळू शकलो नाही. पुणेकरांना लाजवतील इतक्या पाट्या `झंकार`मध्ये होत्या. त्यातली एक पाटी अशी होती की, रस्सा पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पण कदाचित आम्ही बाहेरगावाहून आल्यामुळं आम्हाला पुन्हा पुन्हा रस्सा देताना त्यानं का-कू केलं नाही. फक्त रस्साच नाही तर कांदा, शेव आणि लिंबूही त्यानं दोन-तीनदा फिरवलं.
मिसळ इतकी झक्कास होती की, सुरवातील फक्त पोहे खाण्याची तयारी दर्शवणा-यांनाही मिसळ खाण्याचा मोह आवरत नव्हता. मिसळीचा पहिला राऊंड होईपर्यंत पोहे तयार झाले होते. मग काय, सर्वांनी पोह्यांकडे मोर्चा वळवला. पोहे पण लय भारी होते. पोहे करताना झणझणीत ठेच्याप्रमाणेच त्यामध्ये लिंबू आणि साखरेची चव जाणवण्यासारखी होती. त्यामुळे त्याला अगदी (माझ्या) घरच्या पोह्यांसारखी चव आली होती. पोहे आणि मटकीचा रस्सा हे अफलातून कॉम्बिनेशन वेड लावणारं होतं. पोह्यांचा पहिला राऊंड झाल्यानंतर मी आणि संदीपनं दोघात एक प्लेट पोहे मागवले. (किती खाल्लं त्याचा विचार केला की, अगदी कसं कसं होतं.)
आणखी सांगायची (किंवा न सांगण्यासारखी म्हणाल तर अधिक उत्तम.) गोष्ट अशी की, त्याठिकाणी आमच्या पोह्याच्या दोन प्लेट संपल्यानंतर `झंकार`चा आचारी वडे काढयला घेत होता. बटाटे स्मॅश करुन त्यामध्ये घालण्यासाठी मिरच्या आणि इतर मसाला तयार करत होता. पोहे संपल्यानंतर आम्हाला खरं तर तिथला वडा टेस्ट करायचा होता. त्यामुळे चहा पिऊन होईपयर्यंत जर वडे काढले तर एक-एक वडा टेस्ट करु, असं ठरलं. पण दुर्दैवानं आम्ही तिथून निघेपर्यंत वडे निघाले नव्हते. सो बॅड ना...
इतकं सगळं रेटल्यानंतर चहा हवाच. `झंकार`समोरच योगेश्वर टी` नावाची एक छोटीशी चहाची टपरी होती. साध्या चहापेक्षा स्पेशल चहा मागवला. काहीसा कडक आणि कमी गोड ही माझ्या स्पेशल चहाची व्याख्या. माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगला चहा मला तिथं मिळाला. दुधात पाणी मिसळलं नसल्यानं म्हणजेच फक्त दूध वापरुन चहा केल्यामुळं त्याची चव आणखीनच चांगली लागत होती चहा चांगला असल्यामुळं आणखी एका स्पेशल मागवला.
मिसळ-पाव, दीड-दोन प्लेट पोहे आणि मग फक्कड चहा घेतल्यानंतर आम्ही साक्रीच्या दिशेनं निघालो... सचिनच्या लग्नामध्ये अस्सल खान्देशी मेन्यू असेल असा विचार मनात ठेवून. संस्कृतमध्ये एक म्हणच आहे की, `मिष्टान्न इतरे जनः` अर्थात, लग्नामध्ये जेवण काय आहे, गोड काय आहे, यामध्येच बहुतेकांना रस असतो. त्यानुसार आम्हालाही तिथल्या जेवणाबद्दल उत्सुकता होतीच.
तुम्ही जर कधी सटाण्याला गेलात तर एस. टी. स्टॅण्डच्या अलिकडे असलेल्या (किंवा पेट्रोल पंपासमोर असलेल्या) झंकार आणि योगेश्वर या स्टॉल्सला नक्की भेट द्या.