शब्द सुंदर तेथे राम... This place is to know various aspects that i present through my various news and articles.
Saturday, May 24, 2008
वडापाव ते बर्गर...
गरमागरम पुरणपोळीपासून ते झणझणीत तांबड्या रश्श्यापर्यंत आणि पाघळणाऱ्या लोण्यामुळे लज्जत वाढणाऱ्या कांद्याच्या थालिपीठापासून ते वऱ्हाडी मंडळींच्या अभिमानाचा विषय असलेल्या वडाभातापर्यंत साऱ्या पदार्थांची नुसती नावे ऐकली तरी तोंडाला पाणी सुटणारच. त्यात मालवणी मसाले वापरून केलेले पॉम्फ्रेट किंवा सुरमई मासे, सोलकढी, कोल्हापुरी पद्धतीने बनविलेले झणझणीत चिकन-मटण, खानदेशचे वैशिष्ट्य वांग्याचे भरीत-भाकरी आणि खिचडी, सोलापूरचं सुकं मटण आणि शेंगादाण्याची चटणी, मराठवड्यात प्रसिद्ध असलेली शेंगाची पोळी आणि अस्सल ब्राह्मणी संस्कृतीमध्ये मुरलेले श्रीखंड, सोललेल्या वालाची (डाळिंब्यांची) उसळ व आळूची भाजी.
मराठी खाद्यपदार्थांची यादी करण्याचे ठरविले व प्रत्येक ठिकाणच्या खाद्यपदार्थांची नावे काढण्यास सुरवात केली तर मग विचारता सोय नाही. अर्थात, महाराष्ट्राची खाद्यपताका महाराष्ट्राबाहेरही फडकत ठेवणारा एकमेव पदार्थ म्हणजे अस्सल मराठी वडापाव. महाराष्ट्राला वडापाव ही काही नवी गोष्ट नाही. शिवसेनेने मुंबईमध्ये वडापावला लोकमान्यता मिळवून दिली. हळूहळू मुंबईबाहेरही वडापावची लोकप्रियता वाढली व वडापाव ही महाराष्ट्राची ओळख बनली. पोहे, पुरी भाजी, कट वडा व वडा उसळ या नाश्त्यासाठीच्या अस्सल मराठी पदार्थांच्या यादीत वडापाव रुजू झाला.
महाराष्ट्राबाहेर मराठी पदार्थ म्हणून मान्यता पावलेला आणि खवय्यांच्या पसंतीस उतरलेला सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडापाव. अगदी दिल्लीपासून ते हैदराबादपर्यंत आणि अहमदाबादपासून ते कोलकतापर्यंत बॉम्बे वडापाव (शिवसैनिकांच्या भाषेत मुंबई वडापाव) मिळू लागला आहे. प्रत्येक प्रांतामध्ये त्या ठिकाणच्या आवडीनिवडीनुसार चवीमध्ये बदल होत गेला पण वडापाव कायम राहिला.
झणझणीत मिसळ, पुरणपोळी आणि वडापाव यासारखे महाराष्ट्रीयन पदार्थ जसे महाराष्ट्राबाहेरही लोकप्रिय ठरले तसेच महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतही अनेक बदल होत गेले. सर्वसमावेशाची संस्कृती जोपासणाऱ्या महाराष्ट्राने परप्रांतामधील खाद्यपदार्थांनाही कधी दुय्यम वागणूक दिली नाही. नेहमी भरभरुन प्रेमच केले आहे.
गुजरातमधील कच्छी दाबेली, ढोकळा, फाफडा, खाकरा, ठेपला आणि उँधियो यांनी कधी "मेन्यू कार्ड'मध्ये आणि खवय्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळविले ते समजले देखील नाही. तीच गोष्ट दक्षिण भारतातील इडली, डोसा, मेदूवडा आणि सांबार-रस्समची! बंगालचा रसगुल्ला, केरळचा मलबारी पराठा, पंजाबची लस्सी आणि शेकडो प्रकारचे "स्टफ' पराठे, राजस्थानची दाल-बाटी, इंदूरची कचोरी, हैदराबादची चिकन-मटण बिर्याणी हे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत इतके बेमालूमपणे मिसळून गेले आहेत की हे पदार्थ बाहेरचे आहेत यावर विश्वासही बसणार नाही.
परराज्यातीलच नव्हे तर परराष्ट्रातील खाद्यपदार्थांनाही मराठी माणसाने आपलेसे केले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे राईस-नूडल्स आणि सूप्स यांचा समावेश असलेली चायनीज खाद्यसंस्कृती, बर्गर, फ्रॅंकी, हॉटडॉग अशी "जंकफूड'ची संस्कृती जोपासणारे अमेरिकी खाद्यपदार्थ, पिझ्झा आणि पास्ता हे इटालियन खाद्यपदार्थ, नेपाळ, भूतान तसेच भारताच्या ईशान्य भागात लोकप्रिय असलेले मोमोज असे अनेकविध पदार्थ मराठी माणसाच्या जिभेचे चोचले पुरवित आहेत.
मेक्सिकन, लेबनीज, थाई, जॅपनीज आणि कॉन्टिनेन्टल संस्कृतींमधील शेकडो खाद्यपदार्थ भारतात आणि महाराष्ट्रात कधीच दाखल झाले आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ मिळणारी "मल्टिक्युझिन रेस्तरॉं'ची लोकप्रियता वाढू लागली आहे. अर्थात, परराज्यातील आणि परराष्ट्रातील खाद्यपदार्थ कितीही लोकप्रिय झाले तरी त्याचा फटका मराठमोळ्या खाद्यपदार्थांना कधीच बसला नाही आणि यापुढेही बसणार नाही.
मराठी माणसाच्या हृदयातील महाराष्ट्रीयन खाद्यपदर्थांचे स्थान अढळ आहे. पावसाचा वर्षाव सुरु असताना वाफाळलेला चहा व सोबत गरमागरम कांदा भजी खाण्याचा मोह कोणाला आवरणार नाही. रस्त्यावरुन जात असताना उकळत्या तेलात वडे सोडल्यानंतर सुटलेला घमघमाट तुम्हाला त्या गाडीपाशी खेचून नेतो. वरण-भात, पोळी भाजी व आमटी किंवा तिखट कालवण हे नेहमी साधंच वाटणारं जेवण महिनाभर घराबाहेर राहिल्यानंतर स्वर्गसुखासारखं वाटू लागतं.
जी गोष्ट शाकाहारी पदार्थांची तीच मांसाहारी पदार्थांची. बाहेर हॉटेलमध्ये कितीही उत्तम नॉनव्हेज मिळू दे पण घरगुती पद्धतीनं वाटण करुन तयार केलेल्या चिकन किंवा मटणाला वेगळीच चव असते. त्यामुळेच अनेकदा "रेस्तरॉं'मध्ये खास घरगुती पद्धतीने बनविलेले अमुक अमुक पदार्थ येथे मिळतील, अशा पाट्या लावाव्या लागतात. थोडक्यात काय तर महाराष्ट्राला समृद्ध व संपन्न करण्यासाठी जे प्रयत्न झाले किंवा होत आहेत त्यात महाराष्ट्राबाहेरुन आलेल्या व्यक्तींचाही महत्वाचा वाटा आहे. तसाच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती संपन्न करण्यात मराठमोळ्या पदार्थांप्रमाणेच महाराष्ट्राबाहेरील पदार्थांचाही खारीचा का होईना पण वाटा आहेच. सर्वसमावेशकता हा गुण महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने स्वतःच्या खाद्यसंस्कृतीचा विसर न पडू देता पडला आहे, हे विशेष.
सरतेशेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे ती एकच गोष्ट महत्वाची. स्वातंत्र्यवीरांना मासे प्रचंड आवडायचे. त्यांना काही जणांनी विचारले की, तुम्ही तर ब्राह्मण मग तुम्ही मासे कसे काय खाता? सावरकरांनी त्यावेळी दिलेले उत्तर खूप महत्वाचे आहे. सावरकर म्हणाले, ""प्रत्येकाने आपल्याला रुचेल ते आणि महत्वाचे म्हणजे पचेल ते खावे.'' धर्म, संस्कृती, जात, देश, भाषा आणि वर्ण या गोष्टींचा संबंध खाद्यपदार्थांशी जोडला जाऊ नये हेच त्यांना सुचवायचे होते. सामाजिक क्षेत्रातही क्रांतिकारक विचार जोपासणाऱ्या सावरकरांचे खाद्यसंस्कृतीबद्दलचे हे विचारही आजच्या जमान्यात तितकेच उपयुक्त आहेत.
(This Article was Published in Sakal's SATARA editon on 25th May 2008)
Tuesday, March 11, 2008
अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी...

गरमागरम बटाटे वडा आणि फक्कड चहा
वडेवाले जोशी, रोहित वडेवाले, गोली वडापाव, जम्बो वडापाव आणि चौकाचौकांमध्ये गाड्यांवर मिळणाऱ्या वड्याची चव चाखून कंटाळा आला असेल तर शिवाजी रस्त्यावर असलेल्या "प्रकाश स्टोअर्स'च्या गल्लीत असलेल्या अन्नपूर्णाला एकवार जरुर भेट द्या.
आपण त्या गल्लीत शिरल्यानंतर जसजसे "अन्नपूर्णा'च्या जवळ जायला लागू तसतसा आपल्याला वडे तळण्याचा घमघमाट जाणवू लागतो. तेथेच आपली विकेट पडते. मग "एक प्लेट' वडा किंवा दोन वडापाव खाल्ल्याशिवाय आपला आत्मा थंड होत नाही. वास्तविक पाहता अन्नपूर्णा हे खरोखरच नावाप्रमाणे आहे. बटाटा वड्यापासून ते भाजणीच्या वड्यापर्यंत बऱ्याच "व्हरायटी' येथे मिळतात. मग त्यात उडीद वडा व साबुदाणा वडा हे प्रकारही आलेच. दक्षिणेकडील इडली-चटणी देखील आहे. मराठमोळी ओल्या नारळाची करंजीही आहे. पण बटाटा वड्याची चव म्हणाल तर काही औरच!
साधारणपणे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर शिवाजी रस्त्यावरील गर्दी वाढू लागते आणि अन्नपूर्णासमोर उभे राहून खाद्यपदार्थ खाणाऱ्या खवय्यांचीही. पूर्वी कुमठेकर रस्त्यावरील प्रभा विश्रांती गृहातील वडा हा इतरांपेक्षा वेगळा होता. तो अजूनही आहे. पण अनेक अटी आणि नियमांच्या चौकटीत अडकलेला तो वडा न खाल्लेलाच बरा अशी अवस्था होऊन जाते. अन्नपूर्णाचा वडा अगदी तसाच आहे. म्हणजे अटी व नियमांच्या चौकटीत अडकलेला नव्हे. तर चवीला अगदी हटके!
इथे गर्दीच इतकी असते की प्रत्येक घाण्यातील वडे अगदी हातोहात संपतात. त्यामुळे प्रत्येक वेळी गरमगरम वडे हमखास मिळतात. वड्यातील सारणामध्ये बटाटा व कांदा यांच्या जोडीला लसूणाचाही हलका स्वाद असतो. शिवाय या सारणामध्ये लिंबाचीही थोडी चव जाणवते. त्यामुळेच हा वडा इतरांपेक्षा वेगळा ठरतो. चणा डाळीच्या पिठातही मीठ व तिखट असते त्यामुळे तेही बेचव लागत नाही. शिवाय वड्याला चण्याच्या पिठाचे आवरण अगदी पातळ असते. त्यामुळे वडा आणखी लज्जतदार लागतो.
"अन्नपूर्णा'तील चटणीही अगदी चविष्ट. बटाटा वड्यासोबत मिळणारी हिरवी किंवा साबुदाणा वड्यासोबत मिळणारी दाण्याची चटणी दोन्ही चटण्या तितक्याच चवदार. "चटणी वड्यातच टाकली आहे' असे कुमठेकर रस्त्यावरील उपहारगृहात हमखास मिळणारे उत्तर येथे मिळत नाही. वड्याला पुरेशी चटणी येथे दिली जाते. आणखी हवी असेल तर परतही चटणी मिळते. साबुदाणा वडा तितकाच खमंग अन् भाजणीचा वडाही चांगलाच खुसखुशीत. पण माझे ऐकाल तर अनेकदा भेट दिल्यानंतर बटाटा वड्याची चव तुमच्या जिभेवर रुळली की मगच इतर खाद्यपदार्थांकडे वळा.
वडा खाल्ल्यानंतर चहा आलाच. अर्थात, वडा खाल्ला नाही तरी चहा आहेच पण खाल्ल्यानंतर आवर्जून आहेच. चहाची तल्लफ भागविण्यासाठी तुम्हाला खूप दूर जाण्याची गरज नाही. "प्रकाश स्टोअर्स'कडून "रॉंग साईड'ने (अर्थातच, चालत) तुम्ही नाना वाड्याकडे जाऊ लागा. नाना वाड्यासमोर कॉर्नरला महालक्ष्मी नावाचे अमृततुल्य आहे. दूध जास्त आणि पाणी कमी अशा द्रवापासून वेलचीयुक्त चहा प्यायल्यानंतर खाद्य यात्रेचे एक वर्तुळ पूर्ण होईल.
पेरुगेट जवळील "नर्मदेश्वर'सारखा चहा पुण्यातील असंख्य अमृततुल्यांमध्ये मिळतो. "महालक्ष्मी' येथील चहा त्याजवळ जाणारा पण अगदी तसा नाही. येथे दूधाचे प्रमाण पाण्यापेक्षा अधिक असल्यामुळे साधा चहाच अगदी "स्पेशल'सारखा वाटतो. "अन्नपूर्णा'चा वडा आणि "महालक्ष्मी'चा चहा यांच्यासाठी शिवाजी रस्त्यावर जाच!
Sunday, February 17, 2008
पत्र्या मारुतीजवळ मिळेल...

Sunday, February 03, 2008
शनिवारवाड्याजवळ "दिल्ली चाट'

Friday, January 25, 2008
नावाप्रमाणेच "सवाई'!

Saturday, January 19, 2008
सौंदर्य व्हेज नॉनव्हेज

Sunday, January 06, 2008
पुण्यातील "दक्षिण भारत"
सकाळीच काही कामानिमित्तानं कॅम्पमध्ये जायचं होतं. त्यामुळं येताना के.ई.एम. रुग्णालयासमोर (साऊथ इंडियन मेसजवळ) मिळणाऱ्या दाक्षिणात्य नाश्त्याचा आस्वाद घ्यावा, असा विचार आला. मग काय येतायेता एक चक्कर झालीच. तिथे गेल्यानंतर मला हैदराबाद, चेन्नई किंवा बंगळूरमध्ये गेल्यासारखंच वाटलं.
जवळपास सहा ते सात गाड्यांवर सांबार-चटणीच्या बरोबर इडली, मेदूवडा, डोसा आणि उत्तप्पा असे दक्षिणी पदार्थ खाण्यात पुणेकर मंडळी गुंग असल्याचे दिसेल. गाड्या जरी सहा-सात असल्या तरी प्रत्येक गाडीवर गर्दी जवळपास सारखीच! शिवाय प्रत्येक गाडीवरील ग्राहक रोजचे किंवा ठरलेले!! रास्ता पेठ, सोमवार पेठ आणि परिसरात दक्षिणी मंडळींचे प्रमाण तुलनेने अधिक. ज्यांना सर्वसाधारणपणे मद्रासी म्हणतात अशा मंडळींचे प्रमाण जाणवण्याइतपत असल्यामुळे या ठिकाणी अशा नाश्त्याच्या गाड्या लागणे नवीन नाही.
सांबार भात आणि रस्सम भात यांच्यासाठी प्रसिद्ध असलेली "मद्रासी मेस' याच ठिकाणी आहे. त्यामुळे दाक्षिणात्य पदार्थांच्या प्रेमींनी इथे जायलाच हवे. असो. सांगण्याचा उद्देश्य असा की, मी तेथे गेलो आणि पुन्हा एकदा हैदराबादची चव अनुभवता आली. पुण्यातील अनेक उडुपी किंवा इतर "रेस्तरॉं"मधून इडली-डोसा मिळतो पण या ठिकाणी गाड्यांवर मिळणाऱ्या पदार्थांची चव काही औरच.
नायर नावाच्या एका व्यक्तीच्या नावे असलेल्या गाडीवर इडली-वडा सांबार मागितला. इडली-मेदूवड्याच्या वरती सांबार आणि सांबारच्याच वरती चटणी अशी डिश समोर आली. मेदूवडा एक नंबर. पण इडली मात्र म्हणावी तितकी मऊ किंवा हलकी नाही. शिवाय सांबारची चवही मद्रासी नव्हती. पण मेदूवड्याची कमाल होती. मेदूवडा इतका हलका होता की विचारु नका. सांबारमध्ये तर त्याची काही वेगळीच चव लागत होती. या गाड्यांवर सांबार आणि चटणी पुन्हा मागितली तरी मिळते. शिवाय जादा चटणी-सांबार देताना मालकाचा चेहराही उपकार केल्यासारखा नव्हता हे विशेष!
हे पदार्थ खाणाऱ्या मंडळींमध्ये अर्थातच दक्षिणी मंडळी कमी होती. जादा संख्या होती ती मराठी आणि गुजराती मंडळींची! ठेपले, खाकरा, फाफडा आणि पापडी यांच्यासारख्या पदार्थांना रविवारची सुटी देऊन गुजराती मंडळींनी गाड्यांभोवती गर्दी केली होती.
या गाड्यांवर आढळणारे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाड्यांवर चटणी आणि सांबारच्या बादल्या किंवा पातेली नसतात. तर हे पदार्थ स्टीलच्या बरण्यांमध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे तुम्हाला इडली किंवा मेदूवडा सांबार हवा असेल तर काही मिनिटे इडली किंवा मेदूवडा सांबारच्या बरण्यांमध्ये बुडवून ठेवला जातो. दोन-एक मिनिटे सांबारमध्ये राहिल्यानंतर मग तो वडा तुमच्या प्लेटमध्ये टाकून त्यावर सांबार आणि चटणी टाकली जाते. आहे की नाही गंमत!
नायर शेजारच्या गाडीवर डोसा, उत्तप्पा आणि हे पदार्थ मिळत होते. डोसा इतका पातळ की दोन मिनिटांमध्ये डोसा तव्यापासून अलग होऊन वर नाही आला तर शप्पथ. येथेही सांबारपेक्षा चटणीच अधिक चांगली. त्यामुळे चटणीला मागणी अधिक! या दोन गाड्यापासून थोडी दूर एका कडेला एक महिला गाडी लावते. तिच्याकडे आज गर्दी कमी होती. पण तिचे वैशिष्ट्य असे की, तिची गाडी संध्याकाळीही असते. इतर गाड्या फक्त सकाळी असतात. शिवाय त्या बाईकडील डोसाही अप्रतिम असतो. वैशाली-रुपालीच्या तोंडात मारेल असा कुरकुरीत डोसा तिच्याकडे मिळतो. कधी जर चुकून त्या भागात गेलात तर जरुर खा!
आणखी एक गाडी येथे आहे तिथे जायला विसरु नका. या गाडीचा परवाना चेट्टीयार नावाच्या माणसाकडे आहे. गाडीवर कदाचित तोच असावा. कपाळाला गंध लावून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरो नाही पण "व्हिलन' म्हणून शोभेल अशी एक व्यक्ती ही गाडी चालविते. चेट्टीयारच्या गाडीचे वैशिष्ट्य असे की, त्याच्याकडे मेदूवडा, इडली, सांबार आणि चटणी हे सर्वच पदार्थ एक नंबर! त्यामुळे तुम्ही जर कधी गेलात तर त्याच्याकडेच जा असा माझा सल्ला असेल. मी पण तेच करणार आहे.
मेदूवडा आणि इडली तितकेच मऊ आणि हलके. चटणी पण घट्ट, थोडी तिखट आणि अगदी थोडी आंबट. सांबारही मद्रासी चवीकडे झुकणारे. चेट्टीयारची आणखी एक खासियत म्हणजे त्याच्याकडे तांदूळ आणि उडदाच्या डाळीच्या पिठापासून तयार केलेले घावन मिळतात. डोश्यापेक्षा थोडे जाड आणि उत्तप्पापेक्षा थोडे पातळ, अशा मधल्याच आकारातील. त्याला घरी आपण घावन म्हणतो त्याला गाडीवर डोसा म्हणतात. तो डोसा एका डिशमध्ये चतकोर आकारात घडी घालून ठेवला जातो. त्यावर नेहमीप्रमाणे चटणी आणि सांबार टाकून "सर्व्ह' केला जातो. तुम्हाला एक डोसा सांबार-चटणी टाकून दे, अशी ऑर्डर ऐकू आली तर घाबरुन जाऊ नका. तुम्हीही असा रगडा एकदा खाऊन बघा. खूष व्हाल.
शिवाय या पदार्थांचे दर फार अधिक नाहीत. इडली-चटणी-सांबार दहा रुपये, इडली-मेदूवडा आणि सांबार-चटणी अकरा रुपये तर मेदूवडा-सांबार-चटणी बारा रुपये. डोसा बारा रुपये आणि उत्तप्पा तेरा रुपये. हॉटेलात जाऊन खाण्यापेक्षा हे अधिक स्वस्त आणि चविष्टही! तिथे गर्दी जमते ती काय उगाचच?
Saturday, January 05, 2008
सर्जा रेस्तरॉं

Friday, December 28, 2007
गुजरातचा "आँखो देखा हाल'!

Friday, December 21, 2007
400 हून अधिक डिश

खवय्यांना खूष ठेवण्यासाठी वेगळ्या डिश तयार करणारे रेस्तरॉं, अशी "खुशबू'ची ओळख करून द्यावी लागेल. वैविध्यपूर्ण व चविष्ट खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतरही खिशाला जास्त चाट बसत नाही, असा अनुभव आपल्याला "खुशबू'तून बाहेर पडताना येतो. काही वर्षांपूर्वी हिराबाग येथे सर्वप्रथम "खुशबू' सुरू झाले. नंतर "खुशबू'ने धनकवडीला स्थलांतर केले. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर "खुशबू रेस्तरॉं'ची शाखा आहे.
"खुशबू'मध्ये जसे वेगळ्या डिशचे पर्याय उपलब्ध आहेत, तसे जेवण्यासाठी बसायचे कुठे, यासाठीही तीन पर्याय आहेत. पहिला म्हणजे हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतरचा "गार्डन'चा! आजूबाजूला शोभेची झाडे व एका कडेला पावभाजी व तवा पुलाव यांचा स्टॉल, छताला टांगलेल्या फळांच्या माळा व प्लॅस्टिकच्या लाल-पिवळ्या खुर्च्या असे अगदी "टिपिकल' वातावरण "गार्डन'मध्ये आहे. थंडगार हवेत बसून गरमागरम जेवण घ्यायचे असेल तर "गार्डन' एकदम "बेस्ट'!
नाहीतर मग आतमध्ये जाऊन "कुशन'चा सोफा अथवा खुर्च्यांवर आरामत बसून निवांत आस्वाद घ्या. "इंटेरिअर' देखील एकदम झकास आहे. लाकडी कलाकुसर, वेगवेगळ्या विषयांवरील पेंटिंग आणि आपल्याला हवा तितका उजेड ठेवता येईल, अशी प्रकाशरचना यामुळे आतही "बोअर' होत नाही. मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाइकांना "पार्टी' द्यायची असेल तर मग वातानुकूलित हॉलच बुक करून टाका! तेथे 28 जण एकावेळी जेवू शकतात.
सदाशिव सॅलियन हे "खुशबू'चे मालक. सॅलियन मूळचे उडुपीचे; पण लहानपणापासून वास्तव्याला पुण्यात. त्यांनी "रेस्तरॉं'मध्ये पडेल ते काम करण्यापासून सुरवात केली. विविध ठिकाणी कामाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी स्वतःचे "रेस्तरॉं' थाटले.
"खुशबू'मध्ये मुळातच गरम मसाला व तेल कमी टाकून खाद्यपदार्थ तयार केले जातात. भाज्या शिजविण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी फेकून न देता ग्रेव्ही, करी अथवा सूप तयार करताना ते वापरले जाते. त्यामुळे भाज्यांमधील सत्त्व वाया जात नाही. पदार्थ तयार करताना कृत्रिम रंग न वापरता भाज्यांपासूनच हिरवा, लाल किंवा तपकिरी असे रंग तयार करतात, असे सॅलियन यांनी स्पष्ट केले.
चायनीज, पालक आणि बेबीकॉर्न सूप अशा अनेक "व्हरायटी' येथे उपलब्ध आहेत; पण सॅलियन यांच्या आग्रहावरून आम्ही जिंजर लेमन हे पचनास उपयुक्त आणि "ऍसिडिटी' घटविणारे पेय घेऊन उदरभरणाची सुरवात केली. थोडासा बदल म्हणून असा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही.
"" "इडली चिली फ्राय' हा पदार्थ पुण्यात सर्वप्रथम आम्ही तयार केला आणि नंतर मग इतर रेस्तरॉंमध्ये तो मिळू लागला. मग आम्ही "इडली शेजवान' या आणखी एका नव्या पदार्थाची निर्मिती केली. आम्ही नेहमीचे पदार्थ देत असतानाच अशा पद्धतीने नव्या "डिश' तयार करतो,'' असे सॅलियन सांगतात. "इडली शेजवान'मध्ये इडलीचे छोटे तुकडे "कॉर्न फ्लॉवर'मध्ये "डिप' करून तपकिरी होईपर्यंत तळून घेतले जातात. मग ते "शेजवान सॉस'मध्ये घोळून इतर सॉसेस टाकून "सर्व्ह' केले जातात. "स्टार्टर'मध्ये ही "खुशबू'तील सर्वात वेगळी डिश!
"व्हेज मुमताज', "व्हेज लाहोरी', "व्हेज मिलीजुली' व "मेथी चमन' यांच्यासह एकूण 45 वेगवेगळ्या पंजाबी डिश येथे उपलब्ध आहेत. पनीर व मश्रुमचे पदार्थ स्वतंत्रपणे "मेनूकार्ड'मध्ये देण्यात आले आहेत. शेजवान सॉस वापरून तयार केलेली "पनीर शेजवान चिलीमिली' ही लालभडक मिक्स भाजी, काजू तसेच "व्हाईट ग्रेव्ही'सह "सर्व्ह' केला जाणारा पनीर तवा स्पेशल व पनीरचे बारीक तुकडे "कॉर्नफ्लॉवर'मध्ये "डिप' करून नंतर ते तळून "स्पायसी ग्रेव्ही'सह वाढला जाणारा "पनीर घुंगरू' विशेष लोकप्रिय.
मश्रुमच्या यादीत "मश्रुम शबनम', "मश्रुम बटर मसाला', "मश्रुम हंडी', "मश्रुम पालक', "मश्रुम पनीर', "मश्रुम करी' व "बेबी कॉर्न मश्रुम मसाला' अशी "व्हरायटी' आहे. आम्ही "व्हेज मराठा' आणि "व्हेज गार्डन' या वेगळ्या भाज्या खाण्यासाठी उत्सुक होतो. त्यामुळे "स्टाटर' न मागविता आम्ही "मेन कोर्स'कडे वळलो.
"व्हेज कोल्हापुरी'चे नाव बदलून "व्हेज मराठा' असे बारसे केले आहे की काय, अशी शंका आपल्याला येते; पण तसे नाही. "व्हेज मराठा' म्हणजे सर्व भाज्या उकडून त्यांचे पकोडे तयार केले जातात. मग ते "ग्रेव्ही'मध्ये "डिप' करून त्यावर लाल मिरचीचा तडका मारला जातो. "व्हेज कोल्हापुरी'इतकीच तिखट पण एकदम वेगळी पद्धत त्यामुळे ही "डिश' आम्हाला प्रचंड आवडली. आम्ही मागविलेली "व्हेज गार्डन' ही "डिश' देखील पसंतीस पडली. हिरवा, तपकिरी आणि लाल अशा तीन रंगांमधील तीन वेगळ्या चवींच्या भाज्या एकाच "डिश'मध्ये मिळतात.
पंजाबी, चायनीज, इडली, डोसा, उत्तप्प्याचे विविध प्रकार, पिझ्झा, पास्ता आणि सॅंडविच यांच्यासह आइस्क्रीम, मिल्कशेक, ज्यूस आणि फालुदा यांच्या 400 हून अधिक डिशमधून आवडीचे पदार्थ निवडता येतात. शिवाय चौघांच्या कुटुंबाला सूप, "स्टार्टर', रोटी-सब्जी, राइस व आइस्क्रीम अशा भरगच्च जेवणाचे बिल तीनशे ते साडेतीनशे रुपये येते.
खुशबू फॅमिली रेस्तरॉं
बिबवेवाडी-कोंढवा रस्ता,
पुणे - 411037.
020-24275573, 24275266
Monday, December 17, 2007
Modi wave in Gujarat

Though rebels form Vishwa Hindu Parishad, Rashtriya Swayamsevak Sangh and BJP stand against Modi. Congress, secularist parties as well as social organizations and so-called impartial Media tried their best to demolish Modi. But in democracy one who has public support is the king. In Gujarat Modi has tremendous public support and they are crazy for his personality. They love his speeches, rallies and his views.
When you visit Gujarat then you get realization of the fact that Keshubhai and other rebels are not that much effective. Media has made hype of it and Keshubhai is again came at the center of the elections. Actually he and his supporters were against Modi in last assembly elections also. But this time they had come openly against Modi. But CM had known this so he started his campaign from last one and half year. Interesting fact is that Keshubhai and his supporters were against Modi in Municipal Corporation, District Panchayat and Gram Panchayat elections also. But that time BJP emerge as single largest party in many areas against all odds. So BJP leaders and workers are not afraid of Keshubhai and his gang.
Another thing is that Congress party has no leader who is capable to fight against Modi. Gujarat Pradesh Congress Party President Bharat Solanki, Ex BJP MP and Now Congress Minster Shankarsingh Waghela and Leader of Opposition Arjun Modwadia are not of that caliber of Modi. He is excellent speaker, good administrator and born leader. He has charismatic personality. People are crazy to hear his speeches. Thousands of people gathered to hear him in a single Corner meeting. Modi takes around eight to ten rallies a day. So one gets idea of his popularity. BJP has created Modi Raths, where people can hear Modi’s recorded speech on TV. Hundreds of people are watching these recorded speeches on TV.
Another thing is that Congress party’s main campaign was against Modi and they never tried to give their ideas and never project any leader as their CM after elections. Congress party’s agenda was to malign Modi’s image. Instead of doing this if Congress party has gone without naming Modi then they would be in better position. Congress President Sonia Gandhi unnecessarily brought Soharabudhin issue in the elections. Digvijaya Singh called BJP workers as Hindu Militants. Because of this once again development issues gone to back seat and other issues, which favors Modi and his Party, come to forefront. This is most effective aspect of the elections.
Another thing is that last time elections were happened on the background of Godhra Carnage. So that time voting percentage was high as compared to then last elections. But this time voters come out heavily and same percentage was maintained though there was no such issue on high. The average voting in Gujarat in various elections is around 50 percent. But this time 60 percent voting means around eight to ten percent votes is increased. Another thing is that percent of women and young voters is remarkable. Modi is more popular than any other leader in Gujarat in these two sections of society.
When I visited Surat, Vadodara and Ahemdabad I realized the fact that Modi has great support and Modi’s victory is now just a formality. But all the media persons were trying to develop such a picture that he is trailing in elections. But when results of exit polls come out everybody was amazed when they showed that BJP will get around 100 to 110 seats. But my calculation is that Modi (BJP) will get not less than 120 seats, just seven less than last time. If we consider all the factors discuss above according to my predictions BJP will loose only 5 to 10 seats in Saurashtra and Central Gujarat but they will cover that loss in North Gujarat, where Congress facing rebel candidates.
Saturday, December 15, 2007
रामकृष्ण रेस्तरॉं

Tuesday, December 11, 2007
Lackluster Speech of PM
Prime Minister Dr. Manmohan Singh attended a rally in Vadodara but his speech was not only lacking enthusiasm and figures or statistics but PM didn’t show much courage to criticize the Gujarat Chief Minister Naredra Modi.
PM in his 25 minutes long speech and 15 minutes press conference didn’t took name of Mr. Modi and criticize the policies and decisions took by government just without naming the chief of that state ministry. When Media persons asked him about not to criticizing Modi, he denied answering the question and turning to another issue. He also didn’t comment about election commission’s notice to UPA chairperson Sonia Gandhi and Congress Leader Digvijaya Singh. He just said that EC is doing their work and I will not interfere in it.
He also pointed out that the first phase of voting in Gujarat and declaring Lal Krishna Advani as Bhartiya Janata Party’s Candidate for Prime Minister’s post must have some links. BJP’s central leadership is also afraid of Modi and they still think that if Modi wins in Gujarat then he will emerge as big problem for central leadership. That why BJP leaders hurriedly announced the name of Advani as next candidate of Prime Minister.
Manmohan Singh also clarified that the development occurred in the state was with central funds and not with the funds of state government. State government is taking false credit of the development. He also claimed that though Gujarat is development track it lacks inclusiveness. Minorities, Advises, SC, ST and other backward class peoples are not included in this development process. If Congress comes to the power then they will make such a process that peoples from all castes and communities will get their rights.
He didn’t give any figure or statistics of financial aid or funds given to Gujarat by centre. Around two to three thousands congress workers were present at the rally.
No Response…
Thousands of peoples are coming to attain the rally of Gujarat Chief Minister Narendra Modi. Other leaders including leaders of Modi’s own party BJP are not much interested to give speech as there is not much crowd to hear them. In Vadodara only 500 to 600 people were present in BJP chief Rajnath Singh’s rally. Sushama Swaraj was also upset with the less response for her rally in Saurashtra. MP of Gandhinagar and former BJP President Lal Krishna Advani also not dared to take a single rally or come to campaign. This is the tragedy of Gujarat campaign. Here only Modi is the person who is attracting thousands of people.
Friday, December 07, 2007
उदरभरणही....मनोरंजनही !

Friday, November 30, 2007
"कावेरी'चा मटण रस्सा-भाकरी कचकून खा!

Friday, November 23, 2007
इच्छाभोजनी "वूडलॅंड्स'

Friday, November 16, 2007
129 वर्षांची विश्वसनीय चव!

Friday, November 09, 2007
सिगरी रेस्तरॉ

Friday, October 26, 2007

केहवा, नन्द्रू याखनी आणि गुश्ताबा!
सूपऐवजी "केहवा', "स्टार्टर' म्हणून "तबकमाझ' किंवा "नन्द्रू चिप्स', "मेन कोर्स'मध्ये "गुश्ताबा' किंवा "नन्द्रू याखनी'... ही नावे अगदीच अपरिचित वाटत आहेत ना ? वाटणारच ! कारण हे पदार्थ काही सर्रास कुठेही मिळत नाहीत. "भारताच्या नंदनवना'तील हे पदार्थ मिळतात फक्त आर. एल. भट्ट यांच्या "वाज्वान' या काश्मिरी हॉटेलमध्ये!
बाणेर रस्त्यावर "पॅनकार्ड' क्लबकडे जाणारा फाटा सोडला, की थोडेसे पुढे गेलात की आलेच हे "वाझवान'."वाझवान'मध्ये पाऊल ठेवताच काश्मीरमधील "हाऊसबोट'मध्ये प्रवेश केल्यासारखे वाटते. काश्मीरचे पारंपरिक दिवे, "हाऊसबोट'च्या छताला वापरले जाणारे लाकूड (खुतुम्बन) व नक्षीकाम केलेल्या पडद्यांपासून (क्रिवेल) केलेली सजावट, कपाटात ठेवलेल्या तांब्याच्या सुरया ही "वाझवान'ची काही वैशिष्ट्ये! हॉटेलचे आणखी एक वेगळेपण म्हणजे आपण येथे चक्क मांडी घालून पुढ्यातील खाद्यपदार्थांवर आडवा हात मारू शकतो.
"वाझवान'चे दोन-तीन अर्थ आहेत. एक म्हणजे "बल्लवाचार्यांचे हॉटेल', दुसरा ः चांगले रुचकर भोजन व तिसरा अर्थ आहे अत्यंत प्रेमाने होणारा पाहुणचार. या तिन्ही गोष्टींचा प्रत्यय "वाझवान'मध्ये येईल. इथले पदार्थ अगदी वेगळ्या पद्धतीने तयार केलेले. वेगळ्या चवीचे. मसाले अगदीच निराळे. आले, लसणाप्रमाणेच बडीशेप व हिंग यांचा वापर भरपूर. नारळ मात्र नावालाही नाही. शिवाय प्रत्येक पदार्थासाठी वेगळी "ग्रेव्ही' आणि "ऑर्डर' दिल्यानंतरच पदार्थ तयार करण्याची पद्धत. त्यामुळे अगदी ताजा व गरमागरम पदार्थ आपल्याला "सर्व्ह' केला जातो. त्यामुळेच इथे जायचे तर सोबत थोडा निवांतपणा घेऊनच जायला हवे.
इथले "हट के' पदार्थ म्हणजे केशर, बदाम व इतर गोष्टी वापरून तयार केलेला "केहवा' अर्थात काश्मिरी चहा. जेवणापूर्वी अथवा जेवणानंतरही त्याचा स्वाद घेता येतो. कमळाच्या खोडापासून बनविलेली भाजी "नन्द्रू याखनी', कमळाच्या खोडापासून बनविलेले मसालेदार "नन्द्रू चिप्स' आणि खास काश्मिरी "दम आलू.' इथल्या "दम आलू'चे वैशिष्ट्य म्हणजे मसाले व "ग्रेव्ही' फक्त वरवर न राहता थेट आतपर्यंत झिरपलेले असतात.
शाकाहारी खवय्यांप्रमाणेच मांसाहारी खवय्यांसाठीही "वाझवान' ही पर्वणी आहे. काश्मिरी मसाल्यामध्ये मटणाचे तुकडे दोन ते तीन तास घोळवून नंतर "डीप फ्राय' केलेले "तबकमाझ', मटण तब्बल दोन तास "स्मॅश' करून त्यापासून बनविलेले गोळे व दह्यापासून बनविलेली "करी' यांचा सुरेख संगम म्हणजे "गुश्ताबा' आणि दह्याच्या "करी'मध्ये तयार केलेले "मुर्ग याखनी' हे पदार्थ दिलखूष करून टाकणारे आहेत.
आता राहिला "काश्मिरी पुलाव.' सगळीकडे मिळणारी ही "डिश' इथे "स्वीट' आणि "सॉल्टी' अशा दोन प्रकारांमध्ये मिळते. काजू, पिस्ता, अक्रोड, बदाम आणि खजूर यांचा भरपूर वापर करून बनविलेला पुलाव थोडा का होईना खाऊन बघाच...! सर्वात शेवटी रवा, दूध, केशर आणि सुकामेव्यापासून बनविलेला "फिरनी' ही खास काश्मिरी खीर खायला विसरु नका.
"वाज्वान' खुले असण्याची वेळ ः सायंकाळी सात ते रात्री साडेअकरा.
020-27292422
Thursday, October 18, 2007
पराठ्यांच्या दुनियेत

Saturday, October 06, 2007
कावळा काळा तरीही निराळा...
