Wednesday, May 26, 2010

... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले

एकादशीला झाली पंढरपूर वारी...

देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, विश्वनाथ गरुड, देविदास देशपांडे आणि प्रशांत अनासपुरे) सकाळमध्ये काम करत असताना आमची सोनेरी टोळी होती. सकाळमध्ये टोमणे खाल्ल्याशिवाय काम करताच येत नाही. मी, विश्वनाथ, देविदास आणि आमचा आणखी एक मित्र नंदकुमार वाघमारे. ही आमची सोनेरी टोळी. सवॆ जण आमच्यावर जळायचे. असो. चांगला लेख आहे. वेगळा विषय नको. तर नंदकुमार या आमच्या मित्राचं सोलापुरात लग्न होतं. आम्ही सोमवारी लग्नासाठी सोलापूर गाठलं. म्हणजे पहा २४ मे हा तो दिवस होता. हाच दिवस आमच्यासाठी आश्चयॆकारक ठरला.



सकाळी सातच्या सुमारास सोलापूरसाठी निघालो. मजल दरमजल करत (म्हणजे विविध ठिकाणी खाद्यपदाथॆ आणि पेयपानाचा फडशा पाडत) आम्ही दोनच्या सुमारास लग्न समारंभी म्हणजे विजापूर रोडला पोचलो. हाय हॅलो, शुभेच्छा, ओळखी-पाळखी, काय कसं पार पडलं, हनिमूनला कुठे जाणार अशी विचारपूस हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर जेवण उरकलं. मिष्टान्न इतरे जनः असं म्हणतात. ते आमच्या बाबतीत नेहमीच खरं असतं. जेवण झालं. थोडावेळ थांबलो. मग विजापूर रोडवरुन निघालो.

मग सिद्धेश्वराचं दशॆन घेतलं. सोलापुरात येऊन तिथं गेलो नाही, असं बरोबर वाटत नाही. मग आमचे मित्र आणि ई टीव्हीचे पत्रकार बाबा फुंदे यांच्याबरोबर सिद्धेश्वर मंदिरात गेलो. तिथं एक कथा लिहिली होती. विठ्ठलाचे दशॆन घेण्यासाठी पंढरपूरला जाण्याची गरज नाही. मनात देव असेल तर तो कुठेही दशॆन देतो, असं सिद्धेश्वर यांनी कोणाला तरी सांगितल्याची ती कथा होती. म्हटलं बरंच आहे. पंढरपूरला गेलो नाही तरी हरकत नाही. सिद्धेश्वराचं दशॆन हेच विठ्ठलाचं दशॆन, असं मानून आम्ही मनोभावे नमस्कार करुन निघालो.

साधारण संध्याकाळचे सहा वाजले असतील. पुण्याकडे निघालो. सहाला निघालो म्हणजे बारा-एक वाजेपयॆंत पोचू, असा अंदाज होता. वाटेत मोहोळला गाडीमध्ये पेट्रोल भरले आणि पुढे निघालो. (इथपासून माझा डोळा लागला होता. आपल्याला काय कुठेही झोप लागते. मग मस्त गार वारं सुटलं असताना गाडीत झोप नाही लागली तरच नवल. असो) साधारणतः एक तासभर गेला असेल. रस्ता अनोळखी वाटत होता. वाटेत लागलेला टोलनाकाही येताना लागला होता असं वाटतं नव्हतं. ट्रॅफिकही थोडा कमीच वाटत होता. रस्ता वळणावळणाचा होता. सरळसोट नव्हता. आपण रस्ता चुकलो तर नाही ना, यावर बोलणं सुरु होतं. (त्या तिघांचं) हाच विषय सुरु असताना (इतर तिघे कारण मी झोपलोच होतो) गाडी एका नदीवरच्या फरशी पुलापाशी येऊन पोचली.

च्या मारी... येताना हा पूल आणि ही नदी लागलीच नव्हती. पूल ओलांडला आणि पुढे जाऊन पाहतो तर काय समोर वाळवंट. आई शप्पथ. गाडी पंढरपुरात येऊन पोचली होती. विश्वनाथ आणि प्रशांत ओरडलेच. आपण पंढरपुरात येऊन पोचलो आहोत. त्या आरडा ओरड्याने मला जाग आली. झालं पंढरपुरात आलो म्हणजे प्रवासातील साधारणतः एक तास वाया गेला, असा निष्कषॆ काढत पोटोबाची सोय शोधू लागलो. आधी पोटोबा मग विठोबा हे त्यादिवशी खरेखुरे अनुभवले. दोन-चार भज्यांच्या गाड्यांपैकी एक त्यातल्या त्यात चांगली गाडी पाहिली आणि मस्त गरमागरम भजी मागविली. गरमागरम भजी आल्यानंतर मी फक्त चहाच पिणार, असं म्हणणा-यांचे हातही भजीकडे वळले. दुसरी प्लेट मागविली. मग कोणीतरी शेवचिवडा आणि तळलेल्या मिरच्या मागविल्या. शेवटी दोन कडक स्पेशल घेऊन उठलो. तृप्त मनाने केलेली भक्ती अधिक चांगली असते, असं म्हणतात. (खरं तर असं कोणी काही म्हणत नाही. आपणच आपलं कोणाच्या तरी नावावर बिल फाडायचं...)

पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दशॆन न घेता गेलो असतो तर... मनाला पटतच नाही. मग विठ्ठलाचे दशॆन घेऊन जाण्याचंच ठरलं. विठ्ठलानेच आपल्याला बोलावून घेतलं. अन्यथा रस्ता चुकण्याचं आणि मुद्दाम या वाटेने येण्याचं काहीच कारण नव्हतं. तसंच चौघांनाही पुणे-सोलापूर रस्ता काही नवीन नव्हता. प्रत्येकानं किमान पंधरा ते वीस वेळा तरी सोलापूरची वारी केली असेल. मग हे सारं घडलं कसं. पंढरपूरला जायचं ठरलं नसतानाही आणि चौघांनाही सगळे रस्ते व्यवस्थित माहिती असतानाही हे झालंच कसं.
नरेंद्र दाभोळकरांसारखी मंडळी याला निव्वळ योगायोग म्हणतील. पण त्यावर आमचा विश्वास नाही. रस्ताच चुकायचा होता तर तो चुकून आम्ही पंढरपुरातच का आलो. अक्कलकोट किंवा हैदराबादच्या दिशेने का नाही गेलो? किंवा एखाद्या म्हस्के वस्ती, दांगटवाडी किंवा परबाची वाडी इथं का नाही पोचलो... याचं उत्तर कोणीच देऊ शकणार नाही. दाभोळकर सुद्धा नाही. शिवाय दीड सालाच्या नियोजनातही हा विषय नव्हता. शेवटी आम्हालाही पटलं नियोजन न करताही काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात आणि फसलेल्या बेतांचाही असा चांगला शेवट असू शकतो.

थोडक्यात म्हणजे तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, काहीही करा, त्याच्या इच्छेपुढे कोणाचेच काहीही चालत नाही....

बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल,
श्री द्यानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय...

Saturday, May 15, 2010

मनःपूवॆक आदरांजली...

निष्ठावंत आणि राजकारण्यांचे गुरु...



साधारणपणे 1950 चे दशक! राजस्थानमध्ये त्यावेळी जनसंघाची फारशी ताकद नसली तरी 1958 साली विधानसभेत जनसंघाचे आठ आमदार होते. त्यावेळी राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारने जहागिरदारी (वतनदारी) संपुष्टात आणण्यासाठी विधेयक आणले. जनसंघही जहागिरदारी संपुष्टात आणण्याच्या बाजूने होता. त्यामुळे सरकारने आणलेल्या विधेयकाला विरोध करण्याचा प्रश्‍नच नव्हता. तेव्हा जनसंघाने त्यांच्या आमदारांना सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा देण्याची सूचना केली.

अर्थात, जनसंघाचे आठही आमदार वतनदार होते. त्यांची प्रत्येकाची मोठ्या प्रमाणावर जमीन होती. त्यामुळे जनसंघाच्या आठपैकी सात आमदारांनी पक्षादेश डावलून विधेयकाच्या विरोधात मतदान केले. एका आमदाराने मात्र, स्वतः जहागिरदार असून केवळ पक्षादेश शिरोधार्य मानून जहागिरदारी संपुष्टात आणण्यासाठी मतदान केले. तो आमदार म्हणजे माजी उपराष्टपती भैरौसिंह शेखावत!

जनसंघाच्या सात आमदारांनी विरोधात मतदान करुनही ते विधेयक संमत झाले. विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे सात आमदार पुन्हा जिंकले, हरले किंवा त्यांचे पुढे काय झाले, कोणाच्याही स्मरणात नाही. पण भैरोसिंह शेखावत हे नाव मात्र, त्यानंतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणात संस्मरणीय ठरले. तीनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे शेखावत पाच वर्षे भारताचे उपराष्ट्रपती होते.



बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्शाची उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान अशी तीनही सरकारं बरखास्त केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत फक्त राजस्थानमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आली. भैरोसिंह शेखावत यांच्या अप्रतिम मॅनेजमेंटच्या जोरावरच तिथे भाजप पुन्हा सत्तेवर आला. शेखावत तिस-यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले.

काही महिन्यानंतर शेखावत यांच्यावर अमेरिकेत बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. कदाचित दुसरी असावी. ते अमेरिकेत असताना त्यांच्या मंत्रीमंडळातील एका कनिष्ठ सहका-याने शेखावत यांच्याविरुद्ध बंड केले. शेखावत यांचे नेतृत्व आम्हाला अमान्य असून आता मीच मुख्यमंत्री अशा थाटात त्याने जुळवाजुळव सुरु केली होती. आमदारांचा एक गटही त्याच्या गळाला लागला होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधीने शेखावत पुन्हा भारतात परतणार होते. शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेता-घेता शेखावत यांनी अशी काही जादूची कांडी फिरविली की विचारता सोय नाही. ज्या दिवशी शेखावत पुन्हा राजस्थानात परतले त्याच दिवशी तो बंडखोर आमदारानं शेखावत यांच्या पायावर लोटांगणच घातलं. जो हो गया सो हो गया. अब आप ही तो हमारे नेता है भेरोसिंहजी... असं म्हणत त्या आमदारानं आपली तलवार म्यान केली.

सत्ता टिकविण्यासाठी जे राजकीय चातुयॆ, धूतॆपणा आणि इतरांना मॅनेज करण्याचं कौशल्य लागतं ते शेखावत यांच्याकडे होतं आणि त्या जोरावरच त्यांनी राजस्थानात सत्ता गाजविली. अनेक चढ-उतार आले तरी त्यांनी निष्ठा बदलल्या नाहीत. त्यामुळंच त्यांना तीनवेळा मुख्यमंत्री आणि एकदा उपराष्टपती होता आलं.

अशा या महान नेत्यांना मनोभावे आदरांजली...