Friday, December 28, 2007

गुजरातचा "आँखो देखा हाल'!


कार्यशैलीमुळेच मोदींचा विजय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून गुजरातमध्ये कारकीर्द सुरू करणाऱ्या "त्या' तरुणाला संघ कार्यालयातील खोली विशेष पसंत नव्हती. त्याला खोली एका "इंटिरियर डिझाईनर'कडून सजवून घ्यायची होती. मात्र, वरिष्ठांनी "त्या' प्रचारकाला खोलीच्या सुशोभीकरणाची परवानगी नाकारली. ""कार्यालयात रहायचे असेल, तर प्रचारकाप्रमाणे व्यवहार असला पाहिजे,'' असे चार खडे बोलही सुनावल्याचे संघाचे जुने कार्यकर्ते सांगतात. वरिष्ठांचा मान राखत "त्या' प्रचारकाने आपल्या इच्छेला मुरड घातली व संघप्रचारकाला अपेक्षित साधी जीवनपद्धती स्वीकारली. अर्थात, पुढे प्रत्येक वेळी असे घडलेच असे नाही.

प्रचारक असतानाही संघाच्या करड्या शिस्तीची बंधने सैल करू पाहणारा तो प्रचारक म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी! वडनगरसारख्या छोट्या गावामध्ये जन्मलेल्या नरेंद्रचे वडील रेल्वे स्थानकावर चहाची टपरी चालवित असत. नरेंद्रही त्यांना मदत करीत असे. टपरीवाल्याचा मुलगा ते गुजरातचे मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या नरेंद्र मोदींची कामगिरी थक्क करून टाकणारी आहे.

सर्वसामन्यांची मने जिंकणारी कार्यपद्धती, प्रशासन तसेच अधिकाऱ्यांवर असलेली पकड, विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती, राजकीय डावपेच आखण्यातील हातोटी व उपजत असलेले संघटन कौशल्य असे अनेक गुण गुजरातमधील निवडणुकीदरम्यान जवळून अनुभवता आले.

मोदी हे अहमदाबादमध्ये प्रचारक असताना ते संघ कार्यकर्त्यांच्या घरी आठवड्यातून एकदा "वार लावून' जेवायला जात असत. परशुराम सहस्रभोजनी यांच्याकडेही ते आठवड्यातून एकदा-दोनदा जेवायला जायचे. नंतर संघाला चांगले दिवस आले आणि संघ कार्यालयांमध्येच जेवणाची व्यवस्था होऊ लागली; पण आपण ज्यांचे मीठ खाल्ले त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतरही मोदी विसरले नाहीत. ज्यांच्या घरी आपण "वार लावून' जेवलो त्या सर्व कुटुंबांची मोदी यांनी त्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन भेट घेतली. इतकेच नाही तर त्यांनी आमच्यासारख्या मोजक्‍या आठ-दहा कुटुंबीयांना मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी भोजनाचे निमंत्रणही दिले, अशी आठवण सहस्रभोजनी कुटुंबीय आवर्जून सांगतात.

शिक्षकांनाही मोदींचा तोच न्याय! आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला शिक्षणाचे धडे देणाऱ्या 144 शिक्षकांचा सत्कार मोदींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर केला. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी स्वतःची "कॉमन मॅन' अशी प्रतिमा निर्माण करण्यास प्रारंभ केला आणि त्यामध्ये ते भलतेच यशस्वी झाले.

मोदी विवाहित असले तरी ते अविवाहिताप्रमाणेच आयुष्य जगले. इतर राजकीय नेत्यांच्या आजूबाजूला असणारे नातेवाईकांचे कोंडाळे त्यांच्याभोवती नाही. हा मुद्दाही मोदींच्या फायद्याचा ठरला. स्वच्छ प्रतिमेमुळेच "खातो नथी, खावा देतो नथी' ही मोदींची घोषणा बऱ्यापैकी यशस्वी ठरली. मोदींच्या कार्यकाळात गुजरातमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची अवस्था खूपच "टाईट' आहे, अशी चर्चा अनेक ठिकाणी कानावर येत होती. या चर्चेला थोडे पाठबळ मिळाले ते मोदीविरोधी "अजेंडा' राबविणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ पत्रकाराकडून!

संबंधित पत्रकाराने आयसीआयसीआय बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. कामत यांची एकदा मुलाखत घेतली. मुलाखतीनंतर कामत यांनी त्या पत्रकाराला मोदींबद्दल सांगितले. कामत म्हणाले, ""मध्यंतरी मोदी आणि माझी भेट झाली. तेव्हा मोदी यांनी मला व बॅंकेला सर्वतोपरी साह्य करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच त्यांनी स्वतःच्या मोबाईलचा क्रमांक मला दिला. गुजरातमध्ये कोठेही तुम्हाला आडमार्गाने पैसे मागितले किंवा काही अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर थेट मला फोन करा. तो अधिकारी निलंबित झालेला असेल, असे मोदींनी सांगितले.'' कामत यांना गुजरातमध्ये तसा अनुभव आला नाही. अर्थात, राज्यात सर्वच खात्यांमध्ये अशी परिस्थिती असेल, असा दावा कोणीच करणार नाही. पण म्हणून कामत यांना आलेला अनुभव अगदीच दुर्लक्ष करण्यासारखाही नाही.

कॉंग्रेस, विविध स्वयंसेवी संस्था, अल्पसंख्याक व देशभरातील धर्मनिरपेक्ष संघटनांनी मोदींच्या विरोधात आघाडी उघडली होती. तथाकथित तटस्थ प्रसिद्धीमाध्यमेही मोदींवर खार खाऊन होती. हे कमी म्हणून की काय भारतीय जनता पक्षासह संघ परिवारातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, किसान संघ, विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दल आदी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनीही मोदींविरुद्ध दंड थोपटले होते. "हिंदू सारा एक'चा नारा देऊन भाषणे ठोकण्यात "प्रवीण' असलेल्या विश्‍व हिंदू परिषदेच्या एका नेत्यानेही मोदींविरुद्ध आघाडी उघडली. केशुभाईंच्याच पटेल जातीच्या असलेल्या या नेत्याने शेकडो साधूंना मोदींविरुद्ध रस्त्यावर उतरविले. मोदींच्या कारकिर्दीत एक लाख गाई व अनेक साधूंची हत्या झाली, असे आरोप केले. "ये तो सारे संत है, मोदी तेरा अंत है'' अशा घोषणा असलेल्या जाहिराती प्रकाशित केल्या. पण तरीही मोदींची लोकप्रियता कमी झाली नाही.

इतके आरोप-प्रत्यारोप होऊनही मोदींची प्रतिमा मलिन झाली नाही किंवा त्याचा फटका मोदींना बसला नाही, असे का याबाबत स्पष्टीकरण देताना भाजपचे राज्यसभेतील खासदार जयंतीलाल बारोट यांनी मजेदार किस्सा ऐकविला. गाबाजी ठाकूर नावाचे जनसंघाचे एक जुने आमदार होते. ठाकूर यांच्या ताब्यात असलेली जमीन राज्य सरकारला हवी होती. मात्र, ठाकूर हे जमीन सरकारच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. ठाकूर हे आमदार असल्यामुळे सरकार जोर जबरदस्ती करून कारवाई करू शकत नव्हते. अखेर सरकारने वृत्तपत्रांमधून ठाकूर यांच्याविरुद्ध अपप्रचार सुरू केला. त्यांची निंदानालस्ती सुरु केली. चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. एकवेळ असे वातावरण निर्माण झाले की, ठाकूर यांची अनामत रक्कम जप्त होणारच; पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे गाबाजी ठाकूर हे थोड्या थोडक्‍या नव्हे तर तब्बल 28 हजार मतांनी निवडून आले. त्यामुळे मोदींवर कोणीही कितीही चिखलफेक केली तरी त्याचा फटका न बसता मोदींना फायदाच होतो, अशी भाजप कार्यकर्त्यांची समजूत आहे.

सुरेश मेहता, काशीराम राणा आणि केशुभाई पटेल यांनी बंड करूनही मोदी तरले. कारण त्यांनी गेली विधानसभा तसेच महापालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीतही पक्षविरोधी काम केले होते. ही मंडळी उघडपणे समोर आली. याची कुणकुण मोदींना पूर्वीपासून होती. त्यामुळेच त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी गेल्या दीड वर्षापासून केली होती. मोदींनी एकूण 55 पटेल उमेदवार उभे केले. मोदी स्वतः इतर मागासवर्गीय आहेत. या समाजाची 55 टक्के मते गुजरातेत आहेत. पटेल समाजाला जवळ आणण्याचे प्रयत्न करताना मोदींनी इतर मागासवर्गीयांच्या 55 टक्‍क्‍यांवर विशेष लक्ष केंद्रित केले.

शिवाय भाजप किंवा पूर्वीच्या जनसंघामध्ये बंडखोरीला मतदार व कार्यकर्त्यांकडून विशेष प्रतिसाद मिळत नाही, हा इतिहास आहे. अगदी बलराज मधोकांपासून ते उमा भारतींपर्यंतचा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे गुजरात त्याला अपवाद ठरणार नाही, हे निश्‍चितच होते. उत्सुकता होती ती या बंडखोर मंडळींची ताकद किती आहे, हे जाणून घेण्याची! आणखी एक गोष्ट म्हणजे चिमणभाई पटेल असो किंवा शंकरसिंह वाघेला गुजरातने कधीही बंडखोरांना पुन्हा संधी दिलेली नाही. त्याचीच पुनरावृत्ती केशुभाई आणि मंडळींबाबत झाली आणि बंडखोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक जिंकण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न सपशेल फसला.

मोदींची आक्रमक कार्यशैली, प्रभावी वक्तृत्व आणि गुजराती अस्मितेला साद घालण्याची प्रवृत्ती यामुळे महिला आणि युवा वर्ग त्यांचा विशेष चाहता आहे. जेव्हा हा वर्ग मोठ्या संख्येने बाहेर पडला तेव्हाच मोदींचा विजय निश्‍चित झाला होता. शिक्कामोर्तब 23 डिसेंबरला झाले इतकेच!

Friday, December 21, 2007

400 हून अधिक डिश

खवय्यांची तबीयत "खूष' करणारे "खुशबू'!
खवय्यांना खूष ठेवण्यासाठी वेगळ्या डिश तयार करणारे रेस्तरॉं, अशी "खुशबू'ची ओळख करून द्यावी लागेल. वैविध्यपूर्ण व चविष्ट खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतरही खिशाला जास्त चाट बसत नाही, असा अनुभव आपल्याला "खुशबू'तून बाहेर पडताना येतो. काही वर्षांपूर्वी हिराबाग येथे सर्वप्रथम "खुशबू' सुरू झाले. नंतर "खुशबू'ने धनकवडीला स्थलांतर केले. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर "खुशबू रेस्तरॉं'ची शाखा आहे.

"खुशबू'मध्ये जसे वेगळ्या डिशचे पर्याय उपलब्ध आहेत, तसे जेवण्यासाठी बसायचे कुठे, यासाठीही तीन पर्याय आहेत. पहिला म्हणजे हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतरचा "गार्डन'चा! आजूबाजूला शोभेची झाडे व एका कडेला पावभाजी व तवा पुलाव यांचा स्टॉल, छताला टांगलेल्या फळांच्या माळा व प्लॅस्टिकच्या लाल-पिवळ्या खुर्च्या असे अगदी "टिपिकल' वातावरण "गार्डन'मध्ये आहे. थंडगार हवेत बसून गरमागरम जेवण घ्यायचे असेल तर "गार्डन' एकदम "बेस्ट'!

नाहीतर मग आतमध्ये जाऊन "कुशन'चा सोफा अथवा खुर्च्यांवर आरामत बसून निवांत आस्वाद घ्या. "इंटेरिअर' देखील एकदम झकास आहे. लाकडी कलाकुसर, वेगवेगळ्या विषयांवरील पेंटिंग आणि आपल्याला हवा तितका उजेड ठेवता येईल, अशी प्रकाशरचना यामुळे आतही "बोअर' होत नाही. मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाइकांना "पार्टी' द्यायची असेल तर मग वातानुकूलित हॉलच बुक करून टाका! तेथे 28 जण एकावेळी जेवू शकतात.

सदाशिव सॅलियन हे "खुशबू'चे मालक. सॅलियन मूळचे उडुपीचे; पण लहानपणापासून वास्तव्याला पुण्यात. त्यांनी "रेस्तरॉं'मध्ये पडेल ते काम करण्यापासून सुरवात केली. विविध ठिकाणी कामाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी स्वतःचे "रेस्तरॉं' थाटले.

"खुशबू'मध्ये मुळातच गरम मसाला व तेल कमी टाकून खाद्यपदार्थ तयार केले जातात. भाज्या शिजविण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी फेकून न देता ग्रेव्ही, करी अथवा सूप तयार करताना ते वापरले जाते. त्यामुळे भाज्यांमधील सत्त्व वाया जात नाही. पदार्थ तयार करताना कृत्रिम रंग न वापरता भाज्यांपासूनच हिरवा, लाल किंवा तपकिरी असे रंग तयार करतात, असे सॅलियन यांनी स्पष्ट केले.

चायनीज, पालक आणि बेबीकॉर्न सूप अशा अनेक "व्हरायटी' येथे उपलब्ध आहेत; पण सॅलियन यांच्या आग्रहावरून आम्ही जिंजर लेमन हे पचनास उपयुक्त आणि "ऍसिडिटी' घटविणारे पेय घेऊन उदरभरणाची सुरवात केली. थोडासा बदल म्हणून असा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही.

"" "इडली चिली फ्राय' हा पदार्थ पुण्यात सर्वप्रथम आम्ही तयार केला आणि नंतर मग इतर रेस्तरॉंमध्ये तो मिळू लागला. मग आम्ही "इडली शेजवान' या आणखी एका नव्या पदार्थाची निर्मिती केली. आम्ही नेहमीचे पदार्थ देत असतानाच अशा पद्धतीने नव्या "डिश' तयार करतो,'' असे सॅलियन सांगतात. "इडली शेजवान'मध्ये इडलीचे छोटे तुकडे "कॉर्न फ्लॉवर'मध्ये "डिप' करून तपकिरी होईपर्यंत तळून घेतले जातात. मग ते "शेजवान सॉस'मध्ये घोळून इतर सॉसेस टाकून "सर्व्ह' केले जातात. "स्टार्टर'मध्ये ही "खुशबू'तील सर्वात वेगळी डिश!

"व्हेज मुमताज', "व्हेज लाहोरी', "व्हेज मिलीजुली' व "मेथी चमन' यांच्यासह एकूण 45 वेगवेगळ्या पंजाबी डिश येथे उपलब्ध आहेत. पनीर व मश्रुमचे पदार्थ स्वतंत्रपणे "मेनूकार्ड'मध्ये देण्यात आले आहेत. शेजवान सॉस वापरून तयार केलेली "पनीर शेजवान चिलीमिली' ही लालभडक मिक्‍स भाजी, काजू तसेच "व्हाईट ग्रेव्ही'सह "सर्व्ह' केला जाणारा पनीर तवा स्पेशल व पनीरचे बारीक तुकडे "कॉर्नफ्लॉवर'मध्ये "डिप' करून नंतर ते तळून "स्पायसी ग्रेव्ही'सह वाढला जाणारा "पनीर घुंगरू' विशेष लोकप्रिय.

मश्रुमच्या यादीत "मश्रुम शबनम', "मश्रुम बटर मसाला', "मश्रुम हंडी', "मश्रुम पालक', "मश्रुम पनीर', "मश्रुम करी' व "बेबी कॉर्न मश्रुम मसाला' अशी "व्हरायटी' आहे. आम्ही "व्हेज मराठा' आणि "व्हेज गार्डन' या वेगळ्या भाज्या खाण्यासाठी उत्सुक होतो. त्यामुळे "स्टाटर' न मागविता आम्ही "मेन कोर्स'कडे वळलो.
"व्हेज कोल्हापुरी'चे नाव बदलून "व्हेज मराठा' असे बारसे केले आहे की काय, अशी शंका आपल्याला येते; पण तसे नाही. "व्हेज मराठा' म्हणजे सर्व भाज्या उकडून त्यांचे पकोडे तयार केले जातात. मग ते "ग्रेव्ही'मध्ये "डिप' करून त्यावर लाल मिरचीचा तडका मारला जातो. "व्हेज कोल्हापुरी'इतकीच तिखट पण एकदम वेगळी पद्धत त्यामुळे ही "डिश' आम्हाला प्रचंड आवडली. आम्ही मागविलेली "व्हेज गार्डन' ही "डिश' देखील पसंतीस पडली. हिरवा, तपकिरी आणि लाल अशा तीन रंगांमधील तीन वेगळ्या चवींच्या भाज्या एकाच "डिश'मध्ये मिळतात.

पंजाबी, चायनीज, इडली, डोसा, उत्तप्प्याचे विविध प्रकार, पिझ्झा, पास्ता आणि सॅंडविच यांच्यासह आइस्क्रीम, मिल्कशेक, ज्यूस आणि फालुदा यांच्या 400 हून अधिक डिशमधून आवडीचे पदार्थ निवडता येतात. शिवाय चौघांच्या कुटुंबाला सूप, "स्टार्टर', रोटी-सब्जी, राइस व आइस्क्रीम अशा भरगच्च जेवणाचे बिल तीनशे ते साडेतीनशे रुपये येते.

खुशबू फॅमिली रेस्तरॉं
बिबवेवाडी-कोंढवा रस्ता,
पुणे - 411037.
020-24275573, 24275266

Monday, December 17, 2007

Modi wave in Gujarat


BJP will get not less 120

Now its confirm that Narendra Damodardas Modi will get majority in Gujarat and he will become the Chief Minister once again. This is based on my observation when I was in Gujarat and not on the Exit Poll results declared after second phase of elections. Before elections conclusions were drawn that because of Keshubhai Patel and other rebels Bharatiya Janata Party will loose its majority in Assembly. Congress will gain more seats that last time and they will fight neck and neck to BJP.

Though rebels form Vishwa Hindu Parishad, Rashtriya Swayamsevak Sangh and BJP stand against Modi. Congress, secularist parties as well as social organizations and so-called impartial Media tried their best to demolish Modi. But in democracy one who has public support is the king. In Gujarat Modi has tremendous public support and they are crazy for his personality. They love his speeches, rallies and his views.

When you visit Gujarat then you get realization of the fact that Keshubhai and other rebels are not that much effective. Media has made hype of it and Keshubhai is again came at the center of the elections. Actually he and his supporters were against Modi in last assembly elections also. But this time they had come openly against Modi. But CM had known this so he started his campaign from last one and half year. Interesting fact is that Keshubhai and his supporters were against Modi in Municipal Corporation, District Panchayat and Gram Panchayat elections also. But that time BJP emerge as single largest party in many areas against all odds. So BJP leaders and workers are not afraid of Keshubhai and his gang.

Another thing is that Congress party has no leader who is capable to fight against Modi. Gujarat Pradesh Congress Party President Bharat Solanki, Ex BJP MP and Now Congress Minster Shankarsingh Waghela and Leader of Opposition Arjun Modwadia are not of that caliber of Modi. He is excellent speaker, good administrator and born leader. He has charismatic personality. People are crazy to hear his speeches. Thousands of people gathered to hear him in a single Corner meeting. Modi takes around eight to ten rallies a day. So one gets idea of his popularity. BJP has created Modi Raths, where people can hear Modi’s recorded speech on TV. Hundreds of people are watching these recorded speeches on TV.

Another thing is that Congress party’s main campaign was against Modi and they never tried to give their ideas and never project any leader as their CM after elections. Congress party’s agenda was to malign Modi’s image. Instead of doing this if Congress party has gone without naming Modi then they would be in better position. Congress President Sonia Gandhi unnecessarily brought Soharabudhin issue in the elections. Digvijaya Singh called BJP workers as Hindu Militants. Because of this once again development issues gone to back seat and other issues, which favors Modi and his Party, come to forefront. This is most effective aspect of the elections.

Another thing is that last time elections were happened on the background of Godhra Carnage. So that time voting percentage was high as compared to then last elections. But this time voters come out heavily and same percentage was maintained though there was no such issue on high. The average voting in Gujarat in various elections is around 50 percent. But this time 60 percent voting means around eight to ten percent votes is increased. Another thing is that percent of women and young voters is remarkable. Modi is more popular than any other leader in Gujarat in these two sections of society.
When I visited Surat, Vadodara and Ahemdabad I realized the fact that Modi has great support and Modi’s victory is now just a formality. But all the media persons were trying to develop such a picture that he is trailing in elections. But when results of exit polls come out everybody was amazed when they showed that BJP will get around 100 to 110 seats. But my calculation is that Modi (BJP) will get not less than 120 seats, just seven less than last time. If we consider all the factors discuss above according to my predictions BJP will loose only 5 to 10 seats in Saurashtra and Central Gujarat but they will cover that loss in North Gujarat, where Congress facing rebel candidates.

Saturday, December 15, 2007

रामकृष्ण रेस्तरॉं


"रामकृष्ण'मध्ये जेवा निवांत;
पण शेवटी "गडबड' हवीच !

कॅम्प व शुद्ध शाकाहारी "रेस्तरॉं'...? "ये बात कुछ हजम नही हुई...' असे जर वाटत असेल तर एकदा तरी वेस्टएंड चित्रपटगृहासमोरील "रामकृष्ण रेस्तरॉं'मध्ये जायलाच हवे.या रेस्तरॉंचे व्यवस्थापक आहेत देवेंद्र शेट्टी आणि या ग्रुप ऑफ हॉटेल्सचे प्रमुख आहेत सोमनाथ शेट्टी. सुरवातीला विलेपार्ले, त्यानंतर लोणावळा व सात वर्षांपूर्वी कॅम्पमध्ये हे "रेस्तरॉं' सुरू झाले. दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज व चाट यातील "स्टार्टर'पासून ते "डेझर्ट'पर्यंत एकूण 362 पदार्थांचा भरगच्च "मेनू' सज्ज आहे.

"रामकृष्ण'च्या आवारात शिरताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेते ती "रेस्तरॉं'ची ब्रिटिशकालीन भव्य दगडी वास्तू. वास्तूचे बहिर्रंग जुनेच असले तरी "रेस्तरॉं'चे "इंटेरियर' मात्र एकदम झकास. भव्य हॉल, त्यामध्ये भिंतीवर लाकडी नक्षीकाम, बसण्यासाठी लाकडी खुर्च्या आणि कोच, छताला टांगती झुंबरे. ही अंतर्गत सजावट पाहिल्यावर एखाद्या राजवाड्यामध्येच जेवायला आलो आहोत, असे वाटते. एकूण काय तर "रेस्तरॉं'चा "माहोल' एकदम मस्त आहे. "रामकृष्ण'चे आवार भव्य असल्याने "पिक अवर'मध्येही "पार्किंग'ची विशेष अडचण जाणवत नाही. "रेस्तरॉं'ची क्षमता 320 जणांची असली तरी कदाचित गर्दीमुळे थोडे थांबावे लागू शकते; पण घाबरू नका तुम्ही पाच असा वा पंचवीस, "ऑर्डर' दिल्यानंतर दहा मिनिटांमध्ये पदार्थ "सर्व्ह' झाले नाही तर मग बोला.

दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये अर्थातच इडली, डोसा, उत्तप्पा आणि टोमॅटो ऑम्लेट यांचेच वर्चस्व. डोसाचे 27 विविध प्रकार "रामकृष्ण'मध्ये मिळतात. साधा, मसाला, कट, स्प्रिंग व म्हैसूर मसाला याप्रमाणेच मूँग डोसा हा मुगाच्या डाळीपासूनचा डोसा वेगळा म्हटला पाहिजे. कांदा रवा डोसा हीदेखील हटके "डिश'. उत्तप्प्याचेही अकरा प्रकार उपलब्ध असल्याने तुम्हाला निवडीची प्रचंड संधी आहे.

"चाट'मध्ये "क्रिस्पी फ्राय इडली चाट' आवर्जून खाण्यासारखा आहे. तळलेल्या इडलीवर गोड दही, तीन-चार प्रकारचे सॉस, चाट मसाला आणि शेव टाकून तयारी केलेल्या "इडली चाट'च्या भन्नाट "कॉंबिनेशन'ला मागणी असते. दिल्लीचा प्रसिद्ध "दही भल्ले पापडी चाट', कॉर्न भेळ तसेच "टोकरी चाट' हे पर्यायही आहेतच.

सूपमध्ये चायनीज व इतरत्र मिळणारी सर्व सूप आहेतच. पण "पालक सूप' हे "रामकृष्ण'चे वेगळेपण. उकडलेल्या पालकाची पाने "मॅश' करून घट्टपणासाठी त्यात "कॉर्न फ्लॉवर' किंवा आरारोट मिसळले जाते. मग थोडेसे क्रीम' आणि "गार्निशिंग'साठी किसलेले पनीर. नेहमीच चायनीज किंवा टोमॅटो सूप घेण्यापेक्षा हा पर्याय अधिक चांगला वाटतो.

"पंजाबी'मध्ये इतरत्र मिळणारे सर्वच पदार्थ येथे आहेत; पण त्यातही आलू मेथी, पनीर बटर मसाला, व्हेज चिली मिली, मकई सिमला, बेबीकॉर्न जालफ्रेझी हे पदार्थ खास! पनीर बटर मसाला हा पदार्थ इतर "रेस्तरॉं'मध्ये गोडसर असतो; पण "रामकृष्ण'मधील पनीर बटर मसाला गोड नाही. त्यामुळे चवीमध्ये फरक जाणवण्यासारखा आहे. "व्हेज चिली मिली' एकदम "स्पायसी'! सर्व भाज्या एकत्र परतून नंतर ग्रेव्ही व बटरमध्ये टाकून लसणाचा तडका दिला जातो. त्यामुळे "व्हेज कोल्हापुरी'पेक्षा "व्हेज चिली मिली'च अधिक चांगला पर्याय आहे. "पनीर भुर्जी' देखील "ट्राय' करायला हरकत नाही.

व्हेजमध्ये "चायनीज'ही आहे. त्यातही "इडली चिली' हे वैशिष्ट्य! इडलीचे तुकडे करून त्याला कॉर्नफ्लॉवरचे आवरण चढविले जाते. हे तुकडे "डीप फ्राय' करतात. मग तळलेल्या मिरच्या व चायनीज सॉसमध्ये इडलीचे तळलेले तुकडे घोळले जातात. सुरवातीला मन्च्युरीयन खातो आहोत की काय असेच वाटते; पण नंतर इडलीची चव कळते. लसूनी पनीर, पनीर जिंजर, पनीर, चिली, पनीर शेजवान व मशरूम बांबू शूट्‌स अशी "व्हरायटी' चायनीज "सब्जी'मध्ये आहे.

रोटी व नानमध्ये साधी आणि बटर यांच्याप्रमाणेच मेथी, पुदिना तसेच गार्लिक असे प्रकारही आहेत, तर राईसमध्ये व्हेज बिर्याणीप्रमाणेच काश्‍मिरी, पीज, शाहजानी, चीज, पनीर पुलाव अशी रेलचेल आहे; पण पालक खिचडी, दाल खिचडी किंवा दही खिचडी यांची मजा काही औरच!

आइस्क्रीम, फालुदा, ज्यूस आणि मस्तानी यांनी "मेनू कार्ड'चे रकानेच्या रकाने भरले आहेत; पण त्यातही लक्ष वेधून घेणारे नाव म्हणजे "गडबड'. उडुपीचा हा प्रसिद्ध पदार्थ. व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, चॉकलेट व एखादे "सिझनल' आइस्क्रीम एकत्र केले जाते. त्यात फ्रूट सॅलड व जेली टाकले जाते. नंतर चेरी व "ड्राय फ्रूट' टाकून सजवितात. आइस्क्रीमवर तुटून पडणाऱ्यांनी शेवट "गडबड'नेच केला पाहिजे...!

हॉटेल रामकृष्ण
6 मोलेदिना रस्ता,
वेस्टएंड चित्रपटगृहासमोर,
कॅम्प, पुणे - 41101.
020-26363938

Tuesday, December 11, 2007

Lackluster Speech of PM

NO MODI IN MANMOHAN'S SPEECH

Prime Minister Dr. Manmohan Singh attended a rally in Vadodara but his speech was not only lacking enthusiasm and figures or statistics but PM didn’t show much courage to criticize the Gujarat Chief Minister Naredra Modi.

PM in his 25 minutes long speech and 15 minutes press conference didn’t took name of Mr. Modi and criticize the policies and decisions took by government just without naming the chief of that state ministry. When Media persons asked him about not to criticizing Modi, he denied answering the question and turning to another issue. He also didn’t comment about election commission’s notice to UPA chairperson Sonia Gandhi and Congress Leader Digvijaya Singh. He just said that EC is doing their work and I will not interfere in it.

He also pointed out that the first phase of voting in Gujarat and declaring Lal Krishna Advani as Bhartiya Janata Party’s Candidate for Prime Minister’s post must have some links. BJP’s central leadership is also afraid of Modi and they still think that if Modi wins in Gujarat then he will emerge as big problem for central leadership. That why BJP leaders hurriedly announced the name of Advani as next candidate of Prime Minister.

Manmohan Singh also clarified that the development occurred in the state was with central funds and not with the funds of state government. State government is taking false credit of the development. He also claimed that though Gujarat is development track it lacks inclusiveness. Minorities, Advises, SC, ST and other backward class peoples are not included in this development process. If Congress comes to the power then they will make such a process that peoples from all castes and communities will get their rights.

He didn’t give any figure or statistics of financial aid or funds given to Gujarat by centre. Around two to three thousands congress workers were present at the rally.

No Response…

Thousands of peoples are coming to attain the rally of Gujarat Chief Minister Narendra Modi. Other leaders including leaders of Modi’s own party BJP are not much interested to give speech as there is not much crowd to hear them. In Vadodara only 500 to 600 people were present in BJP chief Rajnath Singh’s rally. Sushama Swaraj was also upset with the less response for her rally in Saurashtra. MP of Gandhinagar and former BJP President Lal Krishna Advani also not dared to take a single rally or come to campaign. This is the tragedy of Gujarat campaign. Here only Modi is the person who is attracting thousands of people.

Friday, December 07, 2007

उदरभरणही....मनोरंजनही !


व्हेज रेस्तरॉं म्हटले, की डोळ्यासमोर येते ते "टिपिकल' पंजाबी, साउथ इंडियन, मराठी किंवा गुजराती. फार तर चायनीज. हे पदार्थ एकाच ठिकाणी मिळणारी रेस्तरॉंही आहेत; पण या पदार्थांच्या जोडीला इटालियन, मेक्‍सिकन, थाई व लेबनीज पदार्थदेखील त्याच व्हेज रेस्तरॉंमध्ये मिळाले तर? आहे अशी व्यवस्था असलेले खऱ्या अर्थाने "मल्टी क्‍युझीन रेस्तरॉं' सातारा रस्त्याजवळील मुकुंदनगरमध्ये आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले हे रेस्तरॉं आहे "मारीगोल्ड'.

एकाच इमारतीत तळमजल्यावर "बोलिंग ऍली', पहिल्या मजल्यावर "मल्टी क्‍युझीन रेस्तरॉं', दुसऱ्या मजल्यावर बॅंक्‍वेट हॉल, लहान मुलांसाठी "व्हिडिओ गेम्स' आणि "स्पोर्टस बार' अशा निरनिराळ्या सुविधा चिराग जैन यांच्या "थ्री डी डेस्टिनेशन'मध्ये उपलब्ध आहेत. तेव्हा उदरभरणाच्या जोडीला मनोरंजनाचा विचार जैन यांनी केल्याचे स्पष्टपणे जाणवते. टापटीप, मांडणीतील सुटसुटीतपणा व भरपूर प्रकाश यामुळे रेस्तरॉंला वेगळाच "रिचनेस' आला आहे. शिवाय एकाच वेळी 108 जण बसतील इतकी आसन व्यवस्था असल्यामुळे जास्त थांबण्याची गरजही नाही.

इडली-सांबारपासून ते "थाई करी'पर्यंत, "खोया काजू मटर' हंडीपासून ते पास्ता-पिझ्झापर्यंत व लखनवी-हैदराबादी बिर्याणीपासून ते "सिझलर्स'पर्यंत विविध ठिकाणच्या खाद्यपदार्थांची रेलचेल "मारीगोल्ड'मध्ये आहे. त्यामुळे एकदा का "मेन्यू कार्ड' हातात घेतले, की कोणता पदार्थ घ्यावा, अशा संभ्रमात पडला नाहीत तरच नवल! अशा परिस्थितीत नेहमीचे भारतीय पदार्थ न मागविता "कॉन्टिनेन्टल' किंवा थाई-लेबनीज पदार्थ "टेस्ट' करा.

"लेबनीज फूड' म्हणाल तर "फलाफेल' विशेष लोकप्रिय आहे. कोबी, सिमला मिरची, भाज्यांचे तुकडे, काबुली चणे, मटार पॅटीस आदी पदार्थांचे "ताहिना' आणि "लेबनीज रेड सॉस'मध्ये घोळून सारण तयार केले जाते. हे सारण मक्‍याच्या पिठापासून तयार केलेल्या पातळ पोळीमध्ये भरून प्रथम "शॅलो फ्राय' आणि नंतर "बेक' केले जाते. फार तिखट नसलेला हा पदार्थ "स्टार्टर' म्हणून "सर्व्ह' केला जातो. ताहिनी या लेबनीज सॉसची चव विशेष जाणवते.

तुम्हाला थोडी "स्पायसी' डिश हवी असेल, तर "मेक्‍सिकन फूड'च्या यादीतील "चिमचंगाज' मागवा. उकडलेले मटार, घेवडा, बेबी कॉर्न, अमेरिकन कॉर्न आणि ढोबळी मिरची यांच्यापासून सारण तयार करून स्वादासाठी टोमॅटो सॉस, चीज, मिरपूड, ओरिगानो व इतर मसाले वापरतात. हे सारण मक्‍याच्या पिठाच्या पातळ पोळीवर पसरून त्याचा रोल तयार करतात. हा रोल "शॅलो फ्राय' व "बेक' करून "साल्सा' अर्थात "मेक्‍सिकन सॉस' सोबत दिला जातो.

"पास्ता'च्या तीन-चार प्रकारांपैकी "अरेबिता पास्ता विथ रेड सॉस' ही खासियत! टोमॅटो, ओरिगानो, मिरपूड, तुळशीची पाने आदी वापरून तयार केलेला सॉस म्हणजे अरेबिता. अरेबिता वापरून तयार केलेला "पास्ता' नुसता पाहिला, की तोंडाला पाणी सुटणारच ! कधी एकदा हे संपवितो, असे तुम्हाला न वाटल्यासच नवल. अरेबिता पास्ता व त्यावर किसलेले चीज म्हणजे केवळ लाजवाब. सोबतीला आले, लसूण, तिखट मिरची वापरून केलेला "रेड सॉस' आहेच.

"सिझलर्स'मध्ये "इंडियन सफारी' हा नावाप्रमाणेच थोडासा भारतीय चवीकडे झुकणारा प्रकार. गरमागरम बिडाच्या तव्यावर कोबीच्या पानात ठेवलेला भात थेट तुमच्या टेबलवरच आणून ठेवतात. वाफा आणि धूर अशा मिश्रणात समोरची डिश इतकी "टेम्टिंग' असते, की विचारता सोय नाही. शिवाय "बेबी कॉर्न' व "फिंगर चिप्स' यांनी ही डिश गार्निश केलेली असते. सोबतीचा "रेड सॉस' चव वाढविणारा.

छोट्या पण गरम इडलीवर लोणी लेपून सांबारमध्ये डुबणाऱ्या अशा बारा इडल्या एकाच डिशमध्ये आपल्यासमोर आणल्या जातात. हलका फुलका आहार घ्यायचा असेल, तर धाकट्या इडलीची (इडीट्टल) ही डिश जरूर खा. त्याचप्रमाणे "6 लिट्‌ल यूएफओ' अर्थात विविध भाज्या आणि सॉसेस यांचे टॉपिंग असलेल्या सहा उत्तप्प्यांची "डिश' हे दक्षिण भारतीय "मेन्यू'तील वेगळेपण!

याशिवाय तालू मे, टोमॅटो का शोरबा, बॅंकॉक रेड करी, करारी नझ्झा, पनीर पीपर शाश्‍लिक, मसाला दाल खिचडी, चिली कॉरिएन्डर राइस व कॉर्न टोमॅटो भरीत हे पदार्थही आवर्जून खाण्याजोगे आहेत. ... आणि हो. जेवण झाल्यानंतर विविध "डेझर्टस' आहेतच; पण तुम्ही अस्सल कॉफीप्रेमी असाल तर फक्त एक कप कॉफी ऑर्डर करा. इतर पदार्थांप्रमाणे तुम्ही कॉफीवरही बेहद्द खूष होऊन घरी परताल याची हमखास खात्री!


मारीगोल्ड रेस्तरॉं
"थ्री डी डेस्टिनेशन',
सुजय गार्डन, मुकुंदनगर
पुणे, 411037.
वेळ सकाळी 11 ते रात्री 11.

Friday, November 30, 2007

"कावेरी'चा मटण रस्सा-भाकरी कचकून खा!


उन्हाळ्यात मस्तानी किंवा आइस्क्रीम, पावसाळ्यात गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा; तर हिवाळ्यामध्ये घाम काढणारा झणझणीत तांबडा रस्सा ! थंडीचा कडाका जसजसा वाढेल, तसतशी झणझणीत रस्सा ही खासियत असणाऱ्या हॉटेलांमधील गर्दी दुणावत जाईल. त्याच त्याच ठिकाणी जाऊन कंटाळला असाल आणि यंदाच्या थंडीमध्ये गावाबाहेर जाऊन एखाद्या नव्या "स्पॉट'ला जाऊन आडवा हात मारण्याची तुमची इच्छा असेल, तर वाघोली गावातील "हॉटेल कावेरी' या अस्सल गावरान "रेस्तरॉं'ला भेट द्याच!

नरसिंग भाऊसाहेब सातव-पाटील यांनी 1996 मध्ये "कावेरी हॉटेल' सुरू केले. प्रारंभी फक्त मित्रांसाठी ते मटण बनवायचे; पण हॉटेल सुरू करावे, हा त्यांच्या मित्रांचाच आग्रह. सुरवातीच्या काळात ते स्वतः पदार्थ तयार करायचे. आताही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पदार्थ तयार होत असल्यामुळे जुनी चव कायम आहे, असे अनेक वर्षांपासून "कावेरी'त जाणारी मंडळी सांगतात. सकाळी 11 ते रात्री 11 या कालावधीत "कावेरी' सुरू असते, अशी माहिती व्यवस्थापक शरद द. पवार यांनी दिली.

वाघोलीसह आता "कावेरी'च्या एकूण पाच शाखा आहेत. मार्केट यार्ड (कृषी उद्योग भवन), पुणे-सोलापूर रस्ता (शेवाळेवाडी), कोथरूड (चांदणी चौक), देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्ग (बालेवाडी जकात नाक्‍याजवळ) येथेही "कावेरी'चे बस्तान बसले आहे. राज्यातील इच्छुक तरुणांना एक वर्ष स्वतः मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या गावी "कावेरी'च्या शाखा उघडण्यासाठी साह्य करण्याची योजना आहे, असे सातव-पाटील सांगतात.

महामार्गांवर असणाऱ्या ढाब्यांपेक्षा "कावेरी'चा चेहरा काही फार वेगळा नाही. तेथे तुम्हाला पार्किंगची समस्या जाणवणार नाही. शिवाय "फॅमिली'साठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने सहकुटुंब जाण्यासही हरकत नाही. आणखी एक जाणवणारी गोष्ट म्हणजे स्वच्छता. एकाच वेळी शंभर जण बसू शकतील इतकी टेबले असल्यामुळे जास्त थांबावेही लागत नाही. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातील आणि "प्लेट' पद्धत नसल्यामुळे भरपेट जेवणाचा आनंदही लुटता येतो. मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या कावेरीत झणझणीत झुणका, भरलं वांगं आणि तर्रीबाज मटकीची उसळ हा अस्सल मराठमोळा "मेनू' असलेली शाकाहारी थाळीही मिळते.

"कावेरी'ची खासियत म्हणजे बोल्हाईचे मटण! मटण थाळीमध्ये मिळणारे रस्सा मटण हे त्यातही विशेष. रस्सा ओरपल्यानंतर भर थंडीतही घाम फुटला नाही तर बोला ! पण झणझणीत म्हणजे नुसताच "जाळ' नाही. तिखटापेक्षा मसाल्याचा वापर अधिक असल्यामुळे रस्सा खाल्ल्यानंतरही जळजळ किंवा इतर त्रास होणार नाही, याची काळजी सातव-पाटलांनी घेतली आहे. रस्सा मटण आणि ज्वारी किंवा बाजरीची भाकरी इतकेच जरी खाल्ले तरी तुम्ही खूष व्हाल. त्याच्या जोडीला सुकं किंवा अळणी मटण, मसालेदार मटण फ्राय व मसालेदार कलेजी फ्राय असे मटणाचे विविध प्रकार "कावेरी'मध्ये उपलब्ध आहेत. जोडीला आहे मटण सूप!

मटण शिजवतानाच त्यात मीठ आणि हळद घातली जाते. मटणाचे तुकडे शिजल्यानंतर ते पाणी "मटण सूप' म्हणून "सर्व्ह' केले जाते; तर हळद आणि मिठाची चव मुरलेले मटण अळणी मटण (सुकं) म्हणून दिले जाते. मसाल्यांचा वापर नसल्याने अळणी मटणात खरा स्वाद समजतो. हेच मटण मसाले घालून "फ्राय' केले, की झाले "मटण फ्राय.' "मटण फ्राय'ही तर्रीबाज आणि रसरशीत. इथला आणखी एक चविष्ट पदार्थ म्हणजे "कलेजी फ्राय.' मटण शिजवून घेतल्यानंतर त्यात असलेले कलेजीचे काही तुकडे वेगळे काढले जातात. ते मीठ, मसाला, तिखट घालून "फ्राय' केले जातात. ही "डिश'ही खाऊन बघण्यासारखी आहे. मटण रस्सा आणि भाकरी यावर कचकून ताव मारा; पण पोटात थोडी जागा ठेवा भातासाठी. बासमती तांदळापासून बनविलेला पांढरा भात, झणझणीत रस्सा आणि झणझणीतपणा वाढविणारा "कावेरी खर्डा' हे "कॉंबिनेशन' खाऊन बघितले नाही तर तुमची "कावेरी'ला भेट व्यर्थ!

नेहमी त्याच त्याच ठिकाणी जाऊन वैतागला असाल तर किमान एकदा तरी "कावेरी'त जायला करायला काय हरकत आहे ? एकदा का तेथे गेलात तर तुम्ही पुन्हा गेल्याशिवाय राहणार नाही, हे निश्‍चित!


चहाची टपरी ते "कावेरी'

नरसिंग सातव यांचे वडील वाघोलीच्या जुन्या एसटी स्टॅंडवर चहाची टपरी चालवायचे. टपरीवर गिऱ्हाईक आल्यानंतर त्यांच्याकडूनच आगाऊ पैसे घेऊन मग चहा, साखर आणि दुधाची खरेदी व्हायची. वडिलांची इतकी हलाखीची परिस्थिती होती. आपल्या पोराने मोठे हॉटेल टाकावे, अशी वडिलांची इच्छा होती. ती आता पूर्ण झाली आहे, असे सातव-पाटील सांगतात.

Friday, November 23, 2007

इच्छाभोजनी "वूडलॅंड्‌स'


"रेस्तरॉं'मध्ये जायचे म्हटले की पहिला प्रश्‍न निर्माण होतो, कोठे जायचे? कोणाला पंजाबी खायचे असते तर कोणाला चायनीज. कोणाला "साउथ इंडियन' आवडते; तर कोणाला साधे घरच्यासारखे जेवण. एखाद्याला "मॉकटेल्स' प्रिय; तर दुसरा म्हणतो फालुदा पाहिजे. प्रत्येकाच्या नाना तऱ्हा! पण आता सर्वांच्या आवडीनिवडी एकाच ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. हे ठिकाण म्हणजे एरंडवण्यातील "वूडलॅंड्‌स!' एखादा पदार्थ तुम्हाला तुमच्या पद्धतीने तयार हवा असेल, तर तसे "इच्छाभोजन'देखील येथे उपलब्ध आहे.

"वूडलॅंड्‌स'ची सुरवात सुमारे दीड वर्षांपूर्वीची ! नावाप्रमाणेच "रेस्तरॉं'मध्ये "वूड'चा पुरेपूर व योग्य वापर केलेला आढळतो. "फ्लोअरिंग'प्रमाणेच सजावटीसाठीही लाकडाचाच उपयोग केल्याने आत शिरताच "वूडलॅंड्‌स'चा "फील' येतो. रेस्तरॉं प्रशस्त आहे. त्यामुळे परिसरात "आयटी' कंपन्या असल्या तरी जागेसाठी ताटकळावे लागत नाही. "वूडलॅंड्‌स'च्या मालक आहेत सायली मुंदडा.
"वूडलॅंड्‌स'मध्ये वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध असले, तरी येथील वैशिष्ट्य म्हणजे दाक्षिणात्य पदार्थ! साध्या इडलीप्रमाणेच कांचीपुरम इडली व रस्सम इडली, मसाला किंवा म्हैसूर डोशाप्रमाणेच स्प्रिंग, चॉप्सी डोसा, पालक डोसा; तसेच मंगळूर डोसा असे इतर प्रकारही उपलब्ध आहेत. दाक्षिणात्य थाळी हे "वूडलॅंड्‌स'चे वेगळेपण. दोन भाज्या, सांबार, रस्सम व मुबलक प्रमाणात भात. शिजवून अगदी बारीक करून घेतलेली तूरडाळ, शिजविलेल्या भाज्या व मसाला यांच्यापासून तयार केलेले रस्सम पिऊन तर बघा! फोडणीला टाकलेल्या कढीलिंबाच्या पानांचा स्वाद रस्समची लज्जत वाढवितो.
वास्तविक "दाक्षिणात्य थाळी'मध्ये पोळ्या किंवा पुऱ्यांची बात नस्से. पण पुण्यातील मंडळींना जेवण पूर्ण झाल्याचे समाधान पोळीशिवाय मिळत नसल्याने "दाक्षिणात्य थाळी'तही पोळी किंवा पुरी दिली जाते. थोडक्‍यात काय, भरपूर भात ओरपायचा असेल, तर "वूडलॅंड्‌स'मध्ये जाच! जिरा राइस, कर्ड राइस, बिर्याणी, पुलाव, कढी खिचडी, पुदिना पुलाव याशिवाय बिसी ब्याळी हुळी अन्न, लेमन राइस, टोमॅटो राइस, पुलिवदा राइस असे खास दाक्षिणात्य भातांचे अनेक चविष्ट प्रकार येथे उपलब्ध आहेत.
तुम्ही जाल तेव्हा बिसी ब्याळी राइस आवर्जून मागवा. फ्लॉवर, गाजर, मटार व फरसबी या भाज्या, तूरडाळ, तांदूळ व मसाला हे एकत्रितपणे शिजवून "बिसी ब्याळी' तयार करतात. हा भात थोडा सरसरीत, चवीला आंबट व तिखटही असतो. "टोमॅटो राइस'ही अगदी वेगळ्या पद्धतीचा. भात शिजवतानाच तो "टोमॅटो प्युरी' शिजवला की खराखुरा "टोमॅटो राइस' तयार! "पुलिवदा राइस' हा मसालेभाताच्या जवळ जाणारा. याची चवही आंबट व तिखट. भात व मसाला एकत्र परतून घेतला जातो. त्यानंतर चिंचेचा कोळ टाकून तांदूळ शिजवला जातो. अशा पद्धतीने तयार होणारा "पुलिवदा राइस'ही अनेकांच्या पसंतीस उतरतो.
रेस्तरॉंचे व्यवस्थापक सुनील मराठे यांनी "महाराष्ट्रीय पिझ्झा' हा वेगळा प्रयोग केला आहे. ब्रेडचा बेस घेऊन त्यावर उकडलेल्या बटाट्यांपासून तयार केलेले सारण थापले जाते. हा ब्रेड कमी तेलात थोडा वेळ "फ्राय' केला जातो. हिरवी-लाल चटणी किंवा टोमॅटो सॉस; तसेच शेव टाकून ते "गार्निश' केले जाते. हा "पिझ्झा'देखील "वूडलॅंड्‌स'चे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. "वूडलॅंड्‌स'मधील पनीर गिलोटी आणि पनीर गिलोटी मसाला या दोन पंजाबी डिश विशेष प्रसिद्ध आहेत. सर्व प्रकारच्या भाज्या एकत्रितपणे शिजवून त्यात मसाले व "चीज' टाकून "स्टफ' तयार केले जाते. पनीरचे चौकोनी तुकडे करून त्यामध्ये हे "स्टफ' भरले जाते. मग हे "पनीर सॅंडविच' तेलावर हलकेच "फ्राय' केले जातात. असे "फ्राय' पनीर सॅंडविच म्हणजेच पनीर गिलोटी! असे "फ्राय' पनीर सॅंडविच टोमॅटो आणि मसालेदार "ग्रेव्ही'ने "गार्निश' केले की तयार होतो "पनीर गिलोटी मसाला.'
"वूडलॅंड्‌स'चे जाणवणारे वेगळेपण म्हणजे "इच्छाभोजन'! मसालेदार व त्याच त्याच भाज्या खाऊन तुम्हाला कंटाळा आला आहे; त्यामुळे तुम्हाला लसणाची फोडणी दिलेली मेथीची परतून केलेली भाजी खायची इच्छा झाली आहे किंवा कारल्याची पंचामृतासारखी भाजी खायची असेल, तर "वूडलॅंड्‌स'चे बल्लव तुमची इच्छा पूर्ण करण्यास तयार आहेत! थोडक्‍यात काय, तर "रेस्तरॉं'च्या "मेनूकार्ड'वर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुम्ही फर्माईश करा आणि ती पूर्ण करू, अशीच ही योजना आहे.

"वूडलॅंड्‌स'
(श्रीनिवास फूड्‌स)
13-2 वेंकटेश्‍वर हाऊस,
शारदा सेंटरजवळ,
एरंडवणा,पुणे- 411 004.
020- 25422422

Friday, November 16, 2007

129 वर्षांची विश्‍वसनीय चव!

चार पिढ्यांची विश्‍वसनीय वाटचाल, वर्षानुवर्षे कायम राहिलेला पदार्थांचा स्वाद, यजमानांचे प्रेमळ आदरातिथ्य व जुन्या वास्तूमध्ये होणारा परंपरेचा साक्षात्कार, अशा अफलातून मसाल्यांच्या मिश्रणातून तयार झालेले अस्सल पारशी पदार्थ मिळतील कॅंपातील सरबतवाला चौकाजवळ असलेल्या "दोराबजी अँड सन्स' या 129 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रेस्तरॉंमध्ये!
दोराबजी सोराबजी यांनी 1878 मध्ये हे रेस्तरॉं थाटले. प्रारंभी चहा-बिस्कूट आणि बनमस्का असे पदार्थ तेथे मिळत. पण रेस्तरॉंला मिळणारा प्रतिसाद पाहून नंतर त्यांनी इतर पदार्थ बनविण्यासही प्रारंभ केला. सोराबजी यांचे नातू नवल, तसेच मर्झबान व केटरिंगचे यथायोग्य शिक्षण घेतलेला पणतू दरायस हे "दोराबजी'ची परंपरा पुढे नेण्याच्या प्रयत्नांत आहेत. गेल्याच्या गेल्या शतकात सुरू होऊनही पूर्वीपेक्षा अधिक जोमाने सुरू असलेले "दोराबजी' हे कदाचित पुण्यातील एकमेव रेस्तरॉं असावे.

मुस्लिम व पारशी हे दोन्ही समाज शेकडो वर्षांपूर्वी इराणमधून भारतात आले आणि त्यातील काहींनी रेस्तरॉंचा व्यवसाय सुरू केला. पुण्यात इराण्यांची अनेक रेस्तरॉं मिळतील, पण पारश्‍यांचे एखाद-दुसरेच! दोन्ही ठिकाणी मिळणारे पदार्थ बहुतांश सारखेच. फरक इतकाच, की इराणी मुस्लिमांचे मसाले सौम्य, तर पारशी मंडळींचे काहीसे उग्र! "रेस्तरॉं'साठी आवश्‍यक मसाले स्वतःच तयार करण्यापासून ते सर्व पदार्थ कोळशाच्या शेगडीवरच तयार करण्याची परंपरा चौथ्या पिढीनेही आग्रहपूर्वक जपली आहे. इतकेच काय, "रेस्तरॉं'ची जुनी इमारत जशीच्या तशी आहे. लाकडी खुर्च्यांऐवजी प्लॅस्टिकच्या खुर्च्या व लाकडी टेबलांवरील "मार्बल टॉप' गायब झाला, हाच काय तो फरक!

"दोराबजी'ची खासीयत म्हणजे दालगोश, चिकन किंवा मटण सालीगोश, मटण किंवा चिकन धनसाक, पात्रा फिश, शामी कबाब आणि "कस्टर्ड' हे पारशी पदार्थ! "दालगोश' हा दालचाचा भाऊ. फक्त मसाले पारशी पद्धतीचे व पुदिन्याचा स्वाद. तूर, मूग व मसूर अशा डाळी आणि भोपळा, वांग्यासह इतर भाज्या एकत्रितपणे शिजविल्या जातात. ही झाली दाल. मग त्यात चिकन अथवा मटण घालून ते सहा ते सात तास शिजविले जाते. अशा पद्धतीने तयार होतो दालगोश. चिकन किंवा मटण "दालगोश' आणि विशिष्ट मसाले वापरून तयार केलेला "ब्राऊन राईस' अशी एकत्रित डिश म्हणजे "धनसाक'.

"पात्रा फिश'ची तर बातच काही और. पॉम्फ्रेट मासा घेऊन त्याला उभे-आडवे छेद दिले जातात. आले, लसूण व मसाल्याचे पदार्थ वापरून तयार केलेली चटणी थापून मासा केळीच्या पानात ठेवून वाफेवर शिजविला जातो. अशा पद्धतीने शिजविला गेलेला गरमागरम "पात्रा फिश' उदरभरणासाठी "सर्व्ह' करतात. शामी कबाब म्हणजे पारशी मसाले वापरून तयार केलेला मटण कबाब. हा कबाब "धनसाक'बरोबर खाण्याची पद्धत आहे. जेवणाचा शेवट गोडानेच करायचा, अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी "स्पेशल कस्टर्ड' आहे. साखरयुक्त दूध गुलाबी व थोडेसे घट्ट होईपर्यंत आटवून नंतर त्यात फेटलेली अंडी टाकायची. हे मिश्रण थोडेसे गरम करून नंतर "बेक' करायचे. ही झाली "कस्टर्ड'ची "रेसिपी'!

अर्थात, यापैकी काही पदार्थ फक्त रविवारीच तयार केले जातात. पण मटण पाया, मटण ब्रेन मसाला, लिव्हर मसाला यांच्यासह बिर्याणी, खिमा आदी पदार्थ दररोज असतात. बिर्याणीमध्ये जाणविणारा मिरी व लवंग यांचा स्वाद, "खिमा'मध्ये होणारा टॉमेटोचा वापर, "साली गोश'मध्ये वापरले जाणारे "पोटॅटो चिप्स', टोमॅटो करी व फेटलेल्या अंड्यात "फ्राय' होणारे चिकन-मटण, चिकन-मटण कटलेट फेटलेल्या अंड्यामध्ये बुडवून तळल्यामुळे येणारी अफलातून चव, ही "दोरबजी'ची वैशिष्ट्ये!

अगदी कर्वे रस्ता, प्रभात रस्ता व औंध भागातून नियमितपणे येथे येणारे ग्राहक आहेत. काय, तुम्हालाही त्यामध्ये सामील व्हायचे आहे? मग वाट कसली पाहत आहात? सदाबहार "नवल अंकल' तुमचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.


दोराबजी अँड सन्स
845, दस्तूर मेहेर मार्ग,
सरबतवाला चौकाजवळ,
पुणे 411001.
020-26145955
020-26834595

Friday, November 09, 2007

सिगरी रेस्तरॉ

फराळानंतर अनुभवा "कबाब'चा रुबाब!

सध्या तुम्ही दिवाळीच्या फराळाचा फडशा पाडत असणार...! होऊ द्या व्यवस्थित फराळ...पण फराळाचे खाऊन खाऊन कंटाळा आल्यानंतर चवीत थोडासा "चेंज' तुम्हाला नक्कीच हवासा वाटेल. फराळाच्या गोडधोड पदार्थांनंतर चटकदार असे काही तरी पाहिजेच ना? मग अगदी बिनधास्तपणे "सिगरी'मध्ये जा!

ढोले-पाटील रस्त्यावर हे "रेस्तरॉ' आहे. "स्पेशालिटी रेस्तरॉ ग्रुप'ने 2006 मध्ये सुरू केलेल्या "सिगरी'चे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक इंटिरियर, शेगडीतील प्रज्वलित अग्नी भासावा अशा पद्धतीने केलेली वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशरचना, मंद प्रकाशाच्या जोडीला हळुवार आवाजातील मधुर संगीत, अत्यंत सुटसुटीत आसनव्यवस्था व तत्पर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून होणारे आदरातिथ्य!

शिवाय संध्याकाळी "एसी'ऐवजी मोकळ्या हवेत बसून खाण्याचा आस्वाद घेण्याची सुविधाही "सिगरी'मध्ये आहे. संध्याकाळी "बार्बेक्‍यू'चा पर्यायही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. "बार्बेक्‍यू' म्हणजे काय, हा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडला असेल. एका टेबलच्या खालच्या बाजूने मध्यभागी कोळशाची शेगडी ठेवण्याची व्यवस्था केलेली असते. त्या शेगडीवर तुम्ही तुम्हाला हवे तशा पद्धतीने कबाब भाजून खाऊ शकता. हेच बार्बेक्‍यू.

"सिगरी'ची खासियत असलेल्या "कबाब'वरच तुम्ही अधिक ताव मारावा, अशा स्वरूपाची योजना आखण्यात आली आहे. ही योजना म्हणजे, "बार्बेक्‍यू'मध्ये तुमच्या आवडीचे कबाब हवे तितके भाजून मनसोक्त खा. "अनलिमिटेड' कबाब खाल्ल्यानंतर जर तुम्हाला, एखादी रोटी, "ग्रेव्ही'युक्त व्हेज अथवा नॉनव्हेज पदार्थ व बिर्याणी खायची असेल तर तुम्हाला नव्याने "ऑर्डर' देण्याची गरज नाही. तुमच्यासाठी "बुफे' तय्यार! "सिटिंग' व "स्टॅंडिंग' अशा दोन्ही प्रकारात "बुफे' उपलब्ध आहे. "अनलिमिटेड' कबाब खाल्ल्यानंतर "बुफे'मध्ये तुमच्यासाठी दोन व्हेज सब्जी, एक नॉनव्हेज पदार्थ, रोटी, लच्छा पराठा, दाल, व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणी आणि एक "डेझर्ट' किंवा "फ्रुट प्लेट' असा भरगच्च मेनू ठेवण्यात आला आहे.

उत्तर भारतीय पदार्थ ही "सिगरी'ची खासियत. पण त्यातही पसंती द्या कबाबलाच! मखमली मकई सिक, मुलतानी चाट, पनीर रावळपिंडी, शबनम कस्तुरी यांच्यासह दहा ते बारा "व्हेज' व अमृतसरी मछली, दक्षिणी मुर्ग, बुऱ्हा कबाब, रान-ए-सिगरी यांच्यासह जवळपास पंधरा "नॉनव्हेज' कबाब तयार आहेत. शाकाहारी पदार्थांच्या यादीत तवा सब्जी, काश्‍मिरी दम आलू, जाफरानी मलई कोफ्ता, पिंड दा चना व कुरकुरी भिंडी यांच्यासह अनेक पदार्थांची रेलचेल आहे. पण "दाल सिगरी' नक्की "ट्राय' करा. मसुरीची डाळ, टोमॅटो प्युरी व लोणी यांच्यापासून तयार केलेली "दाल सिगरी' खाण्यासाठीच काही जण येथे येतात.

दही मेथी मछली, कोलकत्याहून खास येणाऱ्या माशापासून बनविलेला तंदुरी बेटकी मसाला, गोश्‍त लजीज, मुर्ग खुर्चन यांच्याप्रमाणेच "धनिया मुर्ग' ही "सिगरी'ची "स्पेशालिटी'. धने व कोथिंबीर यांच्या "गेव्ही'पासून बनविलेल्या "धनिया मुर्ग'चा स्वाद काही औरच! "डेझर्ट'च्या यादीत काश्‍मिरी "फिरनी', कमळाच्या बिया वापरून बनविलेले "मखनावाली आइस्क्रीम' आणि "मालपुवा विथ रबडी' या थोडाशा "हट के' पदार्थांचा समावेश आहे.

सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7.30 ते रात्री अकरा या वेळेत "सिगरी' सुरू असते. ढोले-पाटील रस्त्यासारख्या "पॉश' वस्तीमधील हे "चकाचक' रेस्तरॉ इतरांपेक्षा अंमळ महागच आहे; पण "बोनस'युक्त दिवाळीनिमित्त हा वेगळा अनुभव घ्यायला काय हरकत आहे?

सिगरी रेस्तरॉ,
"सिटी टॉवर्स' इमारत,
ढोले-पाटील रस्ता,पुणे - 411001.

Friday, October 26, 2007


केहवा, नन्द्रू याखनी आणि गुश्‍ताबा!

सूपऐवजी "केहवा', "स्टार्टर' म्हणून "तबकमाझ' किंवा "नन्द्रू चिप्स', "मेन कोर्स'मध्ये "गुश्‍ताबा' किंवा "नन्द्रू याखनी'... ही नावे अगदीच अपरिचित वाटत आहेत ना ? वाटणारच ! कारण हे पदार्थ काही सर्रास कुठेही मिळत नाहीत. "भारताच्या नंदनवना'तील हे पदार्थ मिळतात फक्त आर. एल. भट्ट यांच्या "वाज्वान' या काश्‍मिरी हॉटेलमध्ये!

बाणेर रस्त्यावर "पॅनकार्ड' क्‍लबकडे जाणारा फाटा सोडला, की थोडेसे पुढे गेलात की आलेच हे "वाझवान'."वाझवान'मध्ये पाऊल ठेवताच काश्‍मीरमधील "हाऊसबोट'मध्ये प्रवेश केल्यासारखे वाटते. काश्‍मीरचे पारंपरिक दिवे, "हाऊसबोट'च्या छताला वापरले जाणारे लाकूड (खुतुम्बन) व नक्षीकाम केलेल्या पडद्यांपासून (क्रिवेल) केलेली सजावट, कपाटात ठेवलेल्या तांब्याच्या सुरया ही "वाझवान'ची काही वैशिष्ट्ये! हॉटेलचे आणखी एक वेगळेपण म्हणजे आपण येथे चक्क मांडी घालून पुढ्यातील खाद्यपदार्थांवर आडवा हात मारू शकतो.

"वाझवान'चे दोन-तीन अर्थ आहेत. एक म्हणजे "बल्लवाचार्यांचे हॉटेल', दुसरा ः चांगले रुचकर भोजन व तिसरा अर्थ आहे अत्यंत प्रेमाने होणारा पाहुणचार. या तिन्ही गोष्टींचा प्रत्यय "वाझवान'मध्ये येईल. इथले पदार्थ अगदी वेगळ्या पद्धतीने तयार केलेले. वेगळ्या चवीचे. मसाले अगदीच निराळे. आले, लसणाप्रमाणेच बडीशेप व हिंग यांचा वापर भरपूर. नारळ मात्र नावालाही नाही. शिवाय प्रत्येक पदार्थासाठी वेगळी "ग्रेव्ही' आणि "ऑर्डर' दिल्यानंतरच पदार्थ तयार करण्याची पद्धत. त्यामुळे अगदी ताजा व गरमागरम पदार्थ आपल्याला "सर्व्ह' केला जातो. त्यामुळेच इथे जायचे तर सोबत थोडा निवांतपणा घेऊनच जायला हवे.

इथले "हट के' पदार्थ म्हणजे केशर, बदाम व इतर गोष्टी वापरून तयार केलेला "केहवा' अर्थात काश्‍मिरी चहा. जेवणापूर्वी अथवा जेवणानंतरही त्याचा स्वाद घेता येतो. कमळाच्या खोडापासून बनविलेली भाजी "नन्द्रू याखनी', कमळाच्या खोडापासून बनविलेले मसालेदार "नन्द्रू चिप्स' आणि खास काश्‍मिरी "दम आलू.' इथल्या "दम आलू'चे वैशिष्ट्य म्हणजे मसाले व "ग्रेव्ही' फक्त वरवर न राहता थेट आतपर्यंत झिरपलेले असतात.

शाकाहारी खवय्यांप्रमाणेच मांसाहारी खवय्यांसाठीही "वाझवान' ही पर्वणी आहे. काश्‍मिरी मसाल्यामध्ये मटणाचे तुकडे दोन ते तीन तास घोळवून नंतर "डीप फ्राय' केलेले "तबकमाझ', मटण तब्बल दोन तास "स्मॅश' करून त्यापासून बनविलेले गोळे व दह्यापासून बनविलेली "करी' यांचा सुरेख संगम म्हणजे "गुश्‍ताबा' आणि दह्याच्या "करी'मध्ये तयार केलेले "मुर्ग याखनी' हे पदार्थ दिलखूष करून टाकणारे आहेत.

आता राहिला "काश्‍मिरी पुलाव.' सगळीकडे मिळणारी ही "डिश' इथे "स्वीट' आणि "सॉल्टी' अशा दोन प्रकारांमध्ये मिळते. काजू, पिस्ता, अक्रोड, बदाम आणि खजूर यांचा भरपूर वापर करून बनविलेला पुलाव थोडा का होईना खाऊन बघाच...! सर्वात शेवटी रवा, दूध, केशर आणि सुकामेव्यापासून बनविलेला "फिरनी' ही खास काश्‍मिरी खीर खायला विसरु नका.

"वाज्वान' खुले असण्याची वेळ ः सायंकाळी सात ते रात्री साडेअकरा.
020-27292422

Thursday, October 18, 2007

पराठ्यांच्या दुनियेत

पराठे पराठे पे लिख्खा है....!

आज अनेकांच्या डब्यात पोळी-भाजीऐवजी वेगवेगळे पराठे दिसतात. उरलेल्या भाजीचं "स्टफिंग' घालून पराठे करण्याचं आता अंगवळणी पडलं आहे. नेहमीचेच पदार्थ खाण्याचा कंटाळा आल्यानंतर पराठ्याला अदिक पसंती मिळते आहे. तुमच्या या बदलत्या चवीला "दिशा' दाखविण्याचा हा एक प्रयत्न!

बटाटा, पनीर, मिक्‍स व्हेज किंवा इतर अनेक गोष्टींचं सारण घातलेला गरमागरम पराठा, त्यावर इकडं तिकडं पसरत जाणारं बटर, सोबत छोले किंवा एखादी पंजाबी भाजी, लोणचं आणि कोशिंबीर असं पोटभर "कॉम्बिनेशन' जिथं मिळतं अशा "हॉट स्पॉट'कडं खवय्याची पावलं वळालीसुद्धा आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरचं चैतन्य, लक्ष्मी रस्त्यावर हमजेखान चौकाजवळचं शाहजीज्‌ पराठा हाऊस व ढोले-पाटील रस्त्यावरचं "नन्दू'ज पराठा हाऊस इथं गेल्यानंतर पराठ्याच्या लोकप्रियतेचा आपल्याला अंदाज येतो.

नन्दू'ज पराठा
पुण्यात पराठा लोकप्रिय कोणी केला, असा प्रश्‍न विचाराल तर "नन्दू'ज पराठा हाऊस'नं असं उत्तर साहजिकपणे येतं. नंदकुमार थदानी यांचा पराठा खाऊ घालण्याचा व्यवसाय यापूर्वी पोलिस आयुक्त कार्यालयासमोरील "गीता ज्यूस बार' किंवा नेहरु मेमोरियल हॉल समोरील "कैलास सेंटर' इथं सुरु होता. तिथून पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी ढोले-पाटील रस्त्यावर "नन्दू'ज पराठा हाऊस सुरु केलं.

छोट्या जागेत आणि दिखाऊपणावर विशेष भर न देता चविष्ट पदार्थ देण्यावर थदानी यांचा भर आहे. आलू, पनीर, चीज या पारंपरिक पराठ्यांबरोबरच कॉर्न, कॅप्सिकम आणि चीज पराठा हे "नन्दू'जचं वैशिष्ट्यं! मक्‍याचे दाणे, ढोबळी मिरची आणि चीज यांच्या एकत्रिकरणातून आलेली भन्नाट चव खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. गरमागरम पराठा, चमचाभर बटर, सोबतीला गोड दही आणि कांदा-टॉमेटो यांचं सॅलेड अशी खचाखच भरलेली डिश समोर आली की पराठा संपविल्याशिवाय अक्षरशः थांबवत नाही.

"नन्दू'जकडे राजमा, छोले, आलूमटर, मटार, वांग्याचे भरीत, मलई कोफ्ता, पनीर कुर्मा, पनीर शाही, चीज करी आणि काजू करी अशा वेगवेगळ्या पदार्थांपासून तयार केलेले पराठेही उलब्ध आहेत. "काजू करी' पराठा हा थोडासा हटकेच म्हटला पाहिजे.

शाहजीज पराठा हाऊस
एकावेळी चार "स्टफ' पराठे खा व बिल देऊ नका. सोबतीला घरापासून हॉटेलपर्यंत व परतीचे रिक्षाचे भाडेही मिळवा, अशी योजना राबविणारे हॉटेल म्हणजे शाहजीज पराठा हाऊस. शाहजीजचा एक पराठा सहजपणे संपतो. पण दुसरा पराठा कसाबसा संपवावा लागतो. अशा परिस्थितीत तब्बल चार-चार पराठे खाणारे वीस पुणेकर शाहजीजच्या जयदीप मनचंदा यांना मिळाले आहेत. पण केवळ या "स्किम'मुळे हॉटेल प्रसिद्ध नाही. तर तेथील खाद्यपदार्थांची चव एकदा चाखली की त्याच्या प्रेमातच पडायला होतं.

पराठा थाळी, अमृतसरी नान थाळी, छोले-भटुरे, दही भल्ले आणि पतियाळा लस्सी असे उत्तर भारतातील वैविध्यपूर्ण पदार्थ येथे मिळतात. इथलं वेगळेपण म्हणजे पापड आणि राईस पराठा. आलू, गोबी, मेथी, कांदा, मुळा, पनीर, चीज यापैकी एक पराठा, दाल माखनी, एक भाजी, बुंदी रायता, लोणचं, रायता, चटणी आणि बटरचा एक "क्‍यूब' अशी भरगच्च थाळी म्हणजे पराठा थाळी. अमृतसरी नान थाळी हा इथला आणखी एक लोकप्रिय प्रकार. दोन "स्टफ' नान (कुलचे), दाल माखनी, चना मसाला, बुंदी रायता, रायता, सॅलाड, चटणी आणि बटर "क्‍यूब' यांचा या थाळीत अंतर्भाव असतो. पतियाळा लस्सी तर चौघांमध्ये एक पुरते.

दहीभल्ले म्हणजे "किंग ऑफ चाट' असं मनचंदा म्हणतात. उडीद डाळीपासून थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनविलेले वडे, मैद्यापासून बनविलेली पापडी, छोले, त्यावर घट्ट व गोड दही, चवीला हिरवी आणि कैरी-कोकम यांच्यापासून बनविलेली लाल चटणी! हे सर्व पदार्थ मनचंदा यांच्या आईच्या कल्पनेतून तयार झालेले आहेत. त्यांची आई अजूनही येऊन भटारखान्यात लक्ष ठेवते. "शाहजीज'मधील चार पराठे खाण्याची स्पर्धा तात्पुरती बंद होती. पण आता ती पुन्हा सुरु करण्यात येणार असून ग्राहकांनी पूर्वसूचना देऊनच येण्याची विनंती करण्यात आली आहे.

चैतन्य पराठा हाऊस
पुण्यामध्ये "कॉम्बिनेशन' पराठा देण्याची सुरवात प्रथम केली ती चैतन्यनं. आलू-चीज, गोबी-चीज, मेथी-कॉर्न, कॉर्न-चीज, मेथी-चीज, कांदा-राजमा अशी अफलातून "कॉम्बिनेशन'चे पराठे येथे आपल्याला मिळतात. इथल्या पराठ्याचा आकार अंमळ जास्त मोठा आहे. नेहमीचे पराठे, अस्सल पंजाबी चवीच्या भाजी, अमृतसरी पनीर, पतियाळा थाळी, दाल माखनी, असा भरगच्च मेन्यू आपल्याला चैतन्यमध्ये मिळतो.

चव तर आहेच पण प्रशस्त जागा आणि निवांतपणा हे इथलं वैशिष्ट्य. राजेश मांगिरा आणि समीरा भगली यांच्या भागीदारीतून चैतन्य पराठा हाऊस सुरु झाले. फर्ग्युसन रस्त्याप्रमाणेच आता कोथरुड आणि कोरेगाव पार्क येथील खवय्यांच्या सेवेला ही मंडळी रुजू झाली आहेत. शिवाय पराठा हाऊस शेजारीच सामिष भोजन आवडणाऱ्यांसाठी स्वतंत्र हॉटेल चैतन्यनं सुरु केलं आहे. अर्थात, दोन्हीचे भटारखाने व बल्लव वेगवेगळे असल्याने अगदी बिनधास्तपणे जायला हरकत नाही. काही खासगी बॅंकांना दुपारचं जेवण पुरविण्याचं कंत्राटही "चैतन्य'कडं आहे.

इथं जाणवणारं आणखी एक वेगळेपण म्हणजे इथं बडीशेप बरोबर गूळही दिला जातो. भरपेट जेवल्यानंतर गूळ पाचकाचे काम करतो. त्यामुळे पंजाबमध्ये किंवा उत्तर भारतात जेवल्यानंतर गूळ खाण्याची पद्धत आहे. तीच पद्धत ते इथंही राबवत आहेत.
Nandu's Paratha House - (020) 26054366
Shahji's Paratha House - (020) 24477810, 24463000.

Saturday, October 06, 2007

कावळा काळा तरीही निराळा...

कावळा...वर्णानं काळाकुट्ट आणि आवाजही बेसूर. त्याच्याकडं गरुडासारखी ताकद नाही. मोरासारखं सौंदर्य नाही. राजहंसारखा दिमाख नाही किंवा कोकिळेसारखा गळा नाही. त्यामुळे तो कोणालाच आवडत नाही. कोणीच त्याच्या प्रेमात पडत नाही. शिवाय "कावळा बसायला आणि फांदी तुटायला...' आणि "झूठ बोलो कौव्वा काटे, काले कौव्वेसे डरियो...' अशा म्हणी तसेच गाण्यांनी कावळ्याची चांगलीच बदनामी केली आहे.

हिंदू धर्मामध्ये एखाद्या व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या दहाव्याला पिंडाला कावळा शिवला किंवा नाही, याचीच उत्सुकता लोकांना अधिक असते. तो शिवला किंवा शिवला नाही तरी लोकांचा कावळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन काही बदलत नाही. पण लहानपणापासून मला दिसणारा कावळा अगदी वेगळा आहे. कावळ्याबाबतची माझी काही निरीक्षणे मुद्दामून येथे देत आहे.

आमच्या घरी स्वयंपाकघराच्या खिडकीला बाहेरच्या बाजूनं कडप्पा लावण्यात आला असून त्यावर मुबलक संख्येने कावळे आमच्याकडे रोज येत असतात. त्यामुळं कावळा घरावर बसला आणि "काव काव' केली की, पाहुणे आले ही गोष्ट आमच्यासाठी आता रोजचं झालेलं आहे. नित्यनियमाने आमच्या खिडकीवर कावळे व इतर पक्षीसमुदाय येण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या आईची गेल्या अनेक वर्षांपासूनची एक साधी सवय.

बहुतेक घरांमध्ये जेवण झाल्यानंतर जमिनीवर सांडलेले अन्न किंवा वाया गेलेले अन्न प्राण्या-पक्ष्यांना घालण्याची पद्धत असते. पण आमच्याकडे थोडी वेगळी परंपरा आहे. कुकरचं प्रेशर पडल्यानंतर गरमागरम भात प्रथम खिडकी बाहेरच्या कडप्प्यावर ठेवला जातो न देवाला नैवेद्य दाखविण्यापूर्वीच तो कावळ्या-चिमण्यांसाठी वाढला जातो. गरमागरम भात तेथे दिसल्यानंतर कावळे, चिमण्या, कबुतरे, कोकिळ आणि इतर अनेक अनोळखी पक्षी तिथं बसकण मारतात.

प्रत्येक पक्षी प्रथम एक-दोनदा चोच मारतो आणि नंतर थोडासा भात आपल्या घरट्यातील पिल्लांसाठी घेऊन जातो. पक्षी तर आहेतच पण गेल्या काही दिवसांपासून गरमागरम भात खाण्यासाठी पिटुकली खारही आता येऊ लागली आहे. पण या सगळ्या मंडळींना गरम भातच हवा का? ते गार किंवा शिळा भातही खातात. इतकंच काय तर भात नसला तर कच्चे किंवा फोडणीचे पोहे, भिजविलेला साबुदाणा, खिचडी, पोळ्यांचे तुकडे, चिवडा अशा विविध पदार्थांवरही हे पक्षी ताव मारतात.

पूर्वी चिमण्या कुठे गायब झाल्या, असा एक आरडाओरडा सुरु होता. पण तेव्हाही आमच्या घरी रोज चिमण्या भात खाण्यासाठी यायच्या. अगदी बारीक आवाजात चिवचिवाट करीत त्या कधी येऊन जायच्या ते कळायचे देखील नाही. मुद्दामून लांबून पाहिलं तर मग कळायचं की चिमण्या आहेत. कबूतर हा शांततेचं प्रतीक मानला जाणारा पक्षी असला तरी तो स्वच्छतेचा प्रतीक अजिबात नाही. भात खातानाही त्याचं खाणं कमी आणि इतरत्र भात उडविणेच जास्त असतं. त्यामुळं खिडकीवरच्या भाताची शितं घरामध्ये पसरलेली आढळली की कबुतरं येऊन गेली हे निश्‍चित समजावं.

या पार्श्‍वभूमीवर कावळ्याचं वेगळेपण अगदी नजरेत भरण्यासारखं आहे. कावळा एकटा आला आणि खाऊन गेला असं कधीच होत नाही. कडप्प्यावर काहीतरी नवीन पदार्थ ठेवला आहे, असं त्याला दिसलं की तो खिडकीवर येऊन बसतो. जोरजोरात "काव काव' करतो. किमान एक-दोन मिनिटे दोस्त मंडळींना हाळी दिल्यानंतर आणखी तीन-चार कावळे खिडकीपाशी येतात. मग हे चार-पाच कावळे आळीपाळीने तो पदार्थ फस्त करतात. काळा एकटा आला आणि खाऊन गेला असं मी आतापर्यंत तरी पाहिलेलं नाही. स्वतः खाणार आणि चोचीमध्ये इतरांसाठी घेऊन जाणार हा नियमही कधी मोडला नाही. तो इतक्‍या चांगल्या पद्धतीने पदार्थ फस्त करतो की काही विचारु नका. भाताचं एकही शित वाया जात नाही की कबुतराप्रमाणे घरामध्येही येत नाही.

खरं तर कावळा हा मांसाहारी प्राणी. मासे, मटण व चिकन यांचे तुकडे तसंच हाडं हे त्याचं आवडतं खाद्यं. इतकंच काय तर एखादी मेलेली घूस किंवा उंदीर, गाडीखाली आलेलं कुत्र किंवा मांजर हे देखील तो अगदी आवडीनं खातो. पण या पक्ष्यानं एकदाही अशा मांसाहारी तसंच किळसवाण्या पदार्थाचा एक तुकडा देखील खिडकीपाशी आणलेला नाही. या गोष्टीचं तर मला अजूनही अप्रूप आणि आश्‍चर्य आहे. दुसऱ्या ठिकाणी मिळालेल्या या गोष्टी त्याला निवांतपणे कडप्प्यावर बसून खाता आल्या नसत्या का? पण असं अजूनही घडलेलं नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळेच माझी कावळा या पक्ष्याबद्दलची मतं अगदी निराळी आहेत.

Thursday, September 27, 2007

Why Mr. Carvalho is angry?


Right issue but wrong time

Indian Hockey players won Asia Cup. Indian Cricket players won Twenty-20 world cup. And few days back Indian soccer players clinched the Nehru Cup. Three different sports, three different tournaments at different venues but common thing is that India is the winner.

Hockey and Soccer tournaments were held in India and Twenty-20 tournament was concluded in South Africa. In Twenty-20 total 12 countries participated. All the giants including Australia, South Africa, Pakistan and New Zealand were there and India won all the matches in tournament except one against NZ in Super Eight. Victory against South Africa, Australia and Pakistan was perfect example of Team Work.

In Asia cup hockey also India won all the seven matches they played. But winning was not the only positive outcome of the tournament. Indians struck 57 goals and accepted just five in tournament. They beat strong teams like South Korea and Japan in Semis.

Though situation was different in Nehru Cup, credit should certainly go to Indians for their victory. Only five teams were participated in it. Syria and Kirgizistan were two teams in tournament which had better performance than India in past. Other two teams, which played, were Bangladesh and Cambodia. In tournament India lost to only Syria in league match but took revenge after winning final against Syria by 1-0.

This is the performance of three different Indian teams, which participated in three different tournaments. After all win is win and nothing is better than success. But still there is controversy after grand reception that was given to Indian Cricket team in Mumbai.

Indian hockey team coach Jockim Carvalho was angry about the Red Carpet treatment given to Indian Cricket team by state Government and Board of Cricket Control of India. First of all we have to accept that though Hockey is National Sports of India Cricket is the only popular sports in India. That’s why people, media and sponsors are behind cricket. Till few years back our Hockey team had no sponsor. After that Castrol Oils came forward and sponsored the team.

Second thing is that if BCCI has welcomed the team and people have turn up to streets in huge numbers to welcome the team then why Mr. Carvalho is upset. It is the fact that Central and State governments are not appreciating victory of sports persons other than cricket. Cricketers are not dependent on government. They are earning lot from sponsors and advertisements. But this is not the thing for other sports. They have to depend a lot on aid by state and central governments.

I recall one incident of Indian archer Chakrovelu. She lives in northeast. She had to wait for more than two years to receive amount of just Two Lac. She fought against red tapism of government. After taking issue in court of central sports minister she got justice but only after two years. This is just an example of how other sports and sports persons are treated in India.

So the point, which Mr. Carvalho has raised, is not wrong but the time, which he selected, is wrong. He should have raised the issue just after Asia Cup victory. Because none can understand the situation of these winners except they raise voice. Unless you raise voice or fight you wont get anything in this country. This is the condition of sports in India.

Hockey players have done extremely well in Asia Cup. Soccer players took tremendous efforts to win Nehru Cup trophy. It is the thing with cricketers also. So government should also treat every sport with same yardstick.

I have heard live interview of Carvalho on Times Now channel. He congratulated Indian team for World Cup victory and said that he was never angry about the grand reception of cricketers. He also asked the various state and Central government to stop giving stepmotherly treatment to sports other than cricket. He never commented that our victory is more prestigious or more meaningful than cricket. He was angry with politicians and not with cricketers and cricket fans. This is the perfect stand by Carvalho. But still question remains that is this the right time to raise this question?

Saturday, September 08, 2007

Logging in Infosys


From Slums to Software

Deepak Vitthal Kadam is joining Infosys. So many software engineers are joining Infosys now days therefore what is new in that? This might be your reaction after reading first sentence. But when you will know his background and the way he fought then you will the gravity of his success.
Who is Deepak? He is a boy from Dandekar Pool Slum near S. P. College or you can say near Lokmanya Nagar. He is studied in Marathi medium school in New English School, Tilak Road. Then he done diploma in Civil Engineering and after completing diploma he bagged degree in civil engineering. Though his father is civil contractor he didn’t want to work as civil contractor like his father. He wanted to go beyond that. So he decided and gets admitted in College of Engineering, Pune for Masters of Technology.

He Just completed his course and in campus interview he get selected for Infosys. Currently he is in Infosys, Mysore to get training for his job. After three months training he will return to Pune. Mysore, Banglore, Hyderabad or Pune his destination is not fixed but job in Infosys is confirmed. That’s why his friends and parents are very happy.

His father owns just two rooms in Dandekar Pool slums. His family includes father, mother, grandmother and three sisters. They were living there all together in that two room house only till 2005. In these conditions he studied well and worked hard to get success. He used to go to Rashtriya Swayamsevak Sangha Shakha regularly. R.S. S. was running Study Hall in Lokmanya Nagar during those days. All the students who are from slum and unable study in home were regular members of that study hall. Of course it was not compulsory to attend RSS shakha to get entry in study hall. So there was tremendous response to that study hall. Deepak was regular member of that study hall.

School, then tuitions, RSS shakha and then study hall this was routine of Deepak. This routine helped him a lot. Though he was a slum boy he is well cultured and decent than many more so called cultured and decent peoples. Good friend of us and is now in Infosys. We are proud of you Deepak.

Last week he went to Mysore for training. Some of his close friends were present at Pune station to wish him. His family members were there and joy of satisfaction was there in eyes of everyone. And why not they should be proud of Deepak? He fought against conditions and proved himself.

Hats off to Deepak!!!

(Actually this is a News for Newspapers. But Deepak told me not to publish this story in paper as his superiors are told him about that. No press publicity without prior permission. But i wanted to write somewhere about his achievement. Blog is perfect stage to for that. So i have written on my blog about Deepak and not in Newspaper like Sakal.)

Saturday, August 25, 2007

"कागदी वाघ' उतरले मैदानावर

इतके दिवस आम्ही "कागदी वाघ' होतो. नुसतेच शब्दांचे चेंडू! पण न कर्त्याच्या वारी मात्र, कॉम्प्युटर आणि कागदावरुन थेट मैदानावर पोचलो. तेव्हा आलेला अनुभव केवळ अवर्णनीय. मुख्य म्हणजे कार्यालयात बसून आणि दूरचित्रवाणीवर सामने पाहून याची खेच, त्याला सल्ले दे, त्याची अक्कल काढ, उगाचच कोणालाही उपदेशाचे डोस पाज, असं करीत पत्रकारिता करणारे पुण्यातले बहुतांश क्रीडा पत्रकार खडकीच्या रेंजहिल्स मैदानावर जमले होते. कारण होतं "आयटी'तले अधिकारी आणि क्रीडा पत्रकार (नुसतेच खेळ आवडणारे नव्हे तर मैदानावर उतरण्याची आवड असणारेही) यांच्याल्या फुटबॉल सामन्याचं. महाराष्ट्र क्रीडा मंडळाने रोहन बिल्डर्सच्या सहाय्याने आयोजित केलेल्या "इंटर आयटी' फुटबॉल स्पर्धेमध्ये पत्रकार आणि "आयटी'तले अधिकारी यांच्यात फुटबॉलचा सामना होता. 45 अधिक 45 असा एकूण 90 मिनिटांचा सामना नव्हता. तर फक्त 15 अधिक 15 असा फक्त अर्धा तास आम्ही मैदानावर होतो. पण अक्षरशः घाम निघाला. "अमुक संघाने सोप्या संधी दवडल्या...' किंवा "तमुक गोलरक्षक चेंडू अडवू शकला नाही...' याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही मैदानावर घेतला.

आमच्या संघात आशिष पेंडसे (जागो) आणि सिद्धार्थ केळकर हे दोघेच क्‍लब स्तरावर फुटबॉल खेळलेले. पण तरीही त्यांचा गेल्या अनेक महिन्यांपासून (कदाचित वर्षांपासून) सराव नव्हता. उर्वरित सर्व खेळाडू हौशे, नवशे आणि गवशे होते. पास मिळाल्यानंतर चेंडू अडविणे, किक मारणे, व्यवस्थित पास देणे हे या बेसिक गोष्टींमध्येच वांदा होता. अगदी माझ्यापासून सगळ्यांचा. माझी एकूणच प्रकृती पाहून सर्वांनीच मला "गोलपोस्ट' सांभाळण्यास भाग पाडले. पण मी देखील मनापासून गोलरक्षक बनण्यास उत्सुक होतो. कारण आपल्या आवडत्या खेळाडूंपैकी एक म्हणजे जर्मनीचा ऑलिव्हर कान. त्याचे काम किती अवघड आणि जिकिरीचे आहे, त्याचा अनुभव मला घ्यायचा होता.

पहिल्याच मिनिटाला माशी शिंकली. विजय जगताप हा "डी'मध्ये असताना त्याच्या हाताला चेंडू लागला आणि प्रतिस्पर्धी संघाला "पेनल्टी किक' बहाल करण्यात आली. गोल झाला हे योगायोगाने आलेच. 1984 ते 92 या कालावधीत भारताकडून खेळणाऱ्या संतोष कश्‍यप यांनी हा पहिला गोल केला. सद्यस्थितीत कौशिक हे महिंद्राचे "लेव्हल टू' प्रशिक्षक आहेत. कौशिक यांनीच पुढे आम्हाला वारंवार सताविले. खेळताना सराव किती महत्त्वाचा हे आम्हाला पटत होते. खेळात सुसूत्रता नव्हती, बचाव फळी भेदली जात होती, आक्रमकांना यश येत नव्हते ही बातम्यांमध्ये लिहिलेली वाक्‍ये आमच्या समोर घडत होती. (दुर्दैवाने फक्त आमच्या बाबतीच)

आम्हाला त्याचे काही दुःख नव्हते. कारण आम्ही फक्त खेळण्यासाठी मैदानात उतरलो होते. विजयासाठी प्रयत्न केले नाहीत, असे नाही. पण विजय मिळणे अवघड आहे, हे आम्हाला माहिती होतेच. त्यामुळे कमीत कमी गोलने पराभव हे उद्दिष्ट डोळ्यासमोर होते. आणखी एक म्हणजे आपल्या अंगात जी रग असते ती जिरविण्याचा खेळणे हा खूप चांगला पर्याय आहे. बऱ्याच वर्षांनंतर ती रग आज जिरली. पूर्वार्धात केळकर, सलील कुलकर्णी आणि पेंडसे यांनी काही सुरेख चाली रचल्या. दोन ते तीन वेळा चेंडू अगदी "गोलपोस्ट'जवळ नेण्यात आमच्या खेळाडूंना यश आले. पण "गोल' साध्य होत नव्हता. पूर्वार्धात आणखी दोन गोल झाले. (अर्थातच, आमच्यावर) त्यापैकी एक कौशिक यांनीच केला. तो मैदानी गोल होता. तर तिसरा गोल माझ्याच चुकीमुळे झाला. "डी'मधून चेंडू टाकताना किंवा "किक' मारताना थोडी गडबड होत होती आणि चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूंकडेच जात होता किंवा चुकीच्या दिशेला जात होता. त्यातच एकदा मी मारलेला चेंडू फार लांब न जाता जवळच उभ्या असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडे गेला. कपाळाला हात लावण्यापलिकडे काहीच पर्याय नव्हता.

उत्तरार्ध आमच्यासाठी थोडा चांगला ठरला. बहुतांश वेळ "आयटी'च्या हाफमध्येच चेंडू होता. चार ते पाच वेळा गोल करण्याचे प्रयत्न आमच्याकडून झाले. त्यापैकी एक-दोनदा तर अगदी थोडक्‍यात गोल होता होता वाचले. त्यामुळे थोडा हुरुप आला. उत्तरार्धातील पहिला आणि सामन्यातील चौथा गोल थोडा गंमतशीर पद्धतीने झाला. प्रतिस्पर्धी खेळाडू चेंडू घेऊन आमच्या "डी'मध्ये आला. त्याला अडविण्यासाठी मी पुढे सरसावलो. तेवढ्यात त्याने मला चकवून चेंडू गोलपोस्टसमोर ढकलला. सुदैवाने तेव्हा तेथे त्यांचा कोणीच खेळाडू नव्हता. त्यामुळे आमच्या एका खेळाडूला चेंडू अडव, असे सांगितले. तेव्हा कदाचित आपण क्रिकेट नव्हे तर फुटबॉल खेळत आहोत, याचा त्याला विसर पडला आणि त्याने "डी'मध्ये चक्क हाताने चेंडू अडविला. आपण हे काय केलं, हे दोन क्षण त्यालाही कळलं नाही. पण दोन सेकंदांनंतर सारेच हास्यकल्लोळात बुडाले. इथेच आमच्यावर चौथा आणि शेवटचा गोल झाला.

गोलरक्षण करताना गडबडीत दोन-तीन सूर मारले. एकदा चेंडू अडविला आणि दुसऱ्यांदा प्रतिस्पर्धी संघातील एका खेळाडूला आडवा केला. "आयबीएम' कंपनीत काम करणारा तो खेळाडू पुन्हा आमच्या "गोलपोस्ट'कडे फिरकला नाही. 4-0 याच निकालावर सामना संपला. सामना हरलो पण हरल्याचे दुःख नव्हते. खेळल्याचे समाधान होते.

आमचा संघ ः आशिष पेंडसे (कर्णधार), सिद्धार्थ केळकर, मिकी आग्नेर, मायकेल जोसेफ, सलील कुलकर्णी, आनंद चयनी, हेमंत जाधव, विजय जगताप, आशिष फडणीस, निखिलेश पाठक, मुकुंद पोतदार (पोतोस्की), श्रीराम ओक, चंदन हायगुंडे आणि आशिष चांदोरकर (गोलरक्षक). "नॉन प्लेईंग कॅप्टन' ः राजेंद्र कानिटकर, व्यवस्थापक ः अमित डोंगरे, "नॉन प्लेईंग मॅनेजर' ः भास्कर जोशी, समर्थक ः मनिष कांबळे.

Thursday, August 23, 2007

चक दे इंडिया...

जोशपूर्ण खेळाचे वेगवान सादरीकरण

"एकदा पाहिल्यानंतर वारंवार पाहण्याची इच्छा होणारा चित्रपट.' "चक दे इंडिया' या चित्रपटाचं परीक्षण करण्यास सांगितलं तर ते एका वाक्‍यात अशाप्रकारे करता येईल. हॉकी या अत्यंत वेगवान व जोशपूर्ण खेळावर आधारित हा चित्रपटही तितकाच वेगवान आणि जोशाने भरलेला आहे. एकदम वरच्या दर्जाचे संवाद आहेत. इतकेच नव्हे तर संघबांधणीपासून ते विजेतेपदापर्यंतच्या प्रवासापर्यंतचे अनेक प्रसंग खूपच उद्‌बोधक आहेत.
प्रसिद्धीमाध्यमे, सरकार, प्रायोजक व प्रेक्षक या चौकडीकडून भारतात हॉकीला किंवा अधिक स्पष्टपणे बोलायचं झालं तर महिला हॉकीला जी वागणूक मिळते, त्याचं यथार्थ चित्रण चित्रपटात करण्यता आलं आहे. सुदैवानं महिला हॉकीवरील चित्रपटाला मिळणारा विलक्षण प्रतिसाद पाहून भारावून जायला होतं. गल्लाभरु चित्रपटांची निर्मिती करण्यापेक्षाही काही जण वेगळा प्रयत्न करताना दिसतात आणि त्याला प्रेक्षकही उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करतात, हे खूपच आनंददायी आहे.
मीररंजन नेगी यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचे सादरीकरण चित्रपटात करण्यात आले आहे. 1982 च्या आशियाई स्पर्धेच्या वेळी नेगी हे भारताचे गोलरक्षक होते. "पेनल्टी शूटआऊट'मध्ये भारत पाकिस्तानकडून पराभूत होतो व त्याचं खापर नेगी यांच्यावर फुटतं. त्यांनी पाकिस्तानकडून पैसे खाल्ले आणि गोल अडविले नाही, असंही म्हटलं जातं. त्यांची कारकिर्द संपते. पुढे हेच नेगी 1998 साली भारताने जिंकलेल्या आशियाई सुवर्णपदकाचे खरे मानकरी ठरतात. 98 साली धनराज पिल्लेच्या नेतृत्त्वाखाली भारत बॅंकॉकला गेला होता. त्यावेळी नेगी हे भारताचे गोलरक्षण प्रशिक्षक होते. तेव्हा सुबय्या नामक गोलरक्षक संघात हवा, हा धनराजचा आग्रह होता. पण नेगी यांनी आशिष बल्लाळच कसा योग्य आहे, हे धनराजला पटवून दिले. अखेरीस सुबय्याऐवजी बल्लाळ मैदानात उतरला आणि दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात "पेनल्टी शूटआऊट'मध्ये बल्लाळनेच भारताला तारले व नेगी यांचा निर्णय सार्थ ठरविला. हेच नेगी 2002 मधील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक बनले. त्या संघाने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करुन नेगी यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला.
"चक दे इंडिया'मध्ये त्याच मीररंजन नेगींची चित्तरकथा काहीशी नाट्यमय स्वरुपात दाखविण्यात आली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात "पेनल्टी स्ट्रोक'वर गोल न करता आल्याने कबीर खानची कारकिर्द संपुष्टात येते. एकतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभव आणि त्यातूनही कबीर खान मुसलमान. त्यामुळे भारताच्या सर्वोत्तम "सेंटर फॉरवर्ड' कबीरला "गद्दार' ही पदवी बहाल करण्यात येते आणि तेथेच त्याची कारकिर्द संपते.
तब्बल सात वर्षे अपमान आणि अवहेलना सहन केल्यानंतर विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी महिलांच्या हॉकी संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी तो हॉकी महासंघाच्या कार्यालयात अवतरतो. नाराजीनेच त्याला हॉकी संघाचे प्रशिक्षक करण्यात येते. तेव्हापासून सुरु होते एका खडतर पण आश्‍वासक प्रवासाची सुरवात. भारतात अजूनही खेळ म्हणजे फक्त "टाईमपास' हे गणित पक्के आहे. त्यातूनही एखाद्या मुलीला त्यात करियर करायचे असेल तर किती अडचणी येतात, त्याची आपण कल्पना करु शकतो. मुलगी अजूनही "चूल आणि मूल' हे अजूनही भारतीयांच्या मनात पक्के आहे. त्याला छेद देण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर नामांकित क्रिकेटपटू त्याच्या हॉकीपटू प्रेयसीला किती तुच्छतेने वागवितो, ते देखील अत्यंत चपखलपणे चित्रित करण्यात आले आहे.
भारताचा संघ तयार करताना आंध्रप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, काश्‍मीर, पंजाब, झारखंड या प्रांतांप्रमाणेच मिझोरम आणि मणिपूर या ईशान्येच्या राज्यांमधील खेळाडूचांही भारतीय संघात आवर्जून समावेश करण्यात आला आहे. झारखंड या प्रांताबद्दलचे अज्ञान, मिझोरम व मणिपूरमधील खेळाडूंना परदेशी नागरिकांप्रमाणे मिळणारी वागणूक व खेळाडूंनी ओळख करुन देताना स्वतःला फक्त राज्यापुरते सिमीत ठेवणे आदी छोट्या छोट्या प्रसांगांमधून चित्रपट प्रेक्षकांवर चांगली पकड निर्माण करतो.
संघबांधणी करताना खेळाडूंचे हेवेदावे, वरिष्ठ-कनिष्ठ वाद, खेळाडूंची "पोझिशन' अशा अनेक गोष्टींमुळे निर्माण झालेले तंटे सोडविण्याचे कबीर खानचे कसब वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक "फॉरवर्ड'ला आपल्या नावावर गोल होण्याची असलेली इच्छा आणि त्यामुळे हातच्या निसटणाऱ्या संधी हे काही नवीन नाही. पण "तुम्ही पुढे गेला नाहीत तरी चालेल पण चेंडू पुढे गेला पाहिजे,' अशा एकेका वाक्‍यातून कबीरने दिलेले धडे प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवितात. कर्णधारपदावरून वरिष्ठ खेळाडूंचे प्रशिक्षकासमवेत उडणारे खटके आणि बहिष्काराचे अस्त्र, प्रायोजकांअभावी महिलांच्या संघाऐवजी पुरुषांच्या संघाला विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पाठविण्याचा हॉकी महासंघाचा हट्ट, कर्णधार होण्यासाठी प्रशिक्षकाशी शरीरसंबंध ठेवण्यास तयार होणारी वरिष्ठ खेळाडू हे प्रसंग सत्यपरिस्थितीची दाहकता दाखवून देतात. अखेरीस पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंग अशा भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला खेळाडूंची मोट बांधण्यात कबीर खान यशस्वी होतो.
प्रत्यक्ष सामन्यांवेळी भारतीय खेळाडूंना येणारी इंग्रजी भाषेची व त्यामुळे संवादाची अडचण, ऑस्ट्रेलियाचे "लॅपटॉप' प्रशिक्षक आणि डोक्‍यात रणनिती तयार करणार कबीर खान यांच्यातील फरक, निर्णायक सामन्यातही संघापेक्षा वैयक्तिक गोलसंख्येला अधिक महत्त्व देणारे खेळाडू आणि कोऱ्या करकरीत हॉकी स्टिक्‍स, बूट व टी-शर्ट पाहिल्यानंतर भारतीय खेळाडूंना होणारा आनंद या गोष्टी खूपच सूचक आणि सत्य परिस्थितीदर्शक आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना "पेनल्टी शूटआऊट'मध्ये जातो. तेव्हा पाय आणि हॉकी स्टीक हलविण्याच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या कृतीवरुन ती चेंडू कुठे मारणार हे आधीच ओळखून गोलरक्षकाला इशारा करणारा कबीर खान (म्हणजेच मीररंजन नेगी) हॉकीचा किती सखोल अभ्यासक आहे, हे दाखविण्यात आले आहे.
तुम्ही क्रीडाप्रेमी असा किंवा नसा, हॉकी तुम्हाला आवडत असो किंवा नसो पण हा चित्रपट जरुर पहा. एकदा नव्हे तर दोनदा-तीनदा पहा. तुम्हीच पाहू नका तर इतरांनाही चित्रपट पाहण्याची विनंती करा. त्यानिमित्ताने का होईना पण क्रिकेटवेड्यांच्या देशात हॉकी या राष्ट्रीय खेळाची तोंडओळख होईल. हॉकीला आयुष्य वाहणाऱ्या धनराजसारख्या हॉकीपटूंची उपेक्षा करणे किती मोठे पाप आहे, याची पुसटशी जाणीव होईल.

ता.क. ः तुम्हाला शाहरुख खान आवडत नसला तरी हा चित्रपट जरुर पहा!
Mukund Potadar has also written about this movie on his blog. Please read his article also if you want more and inner details. His blog id is :

Saturday, August 18, 2007

भारताचा राष्ट्रीय खाद्यपदार्थ कोणता?

पुरीभाजी, सामोसा की पाणीपुरी

भारताचा राष्ट्रध्वज ः तिरंगा, राष्ट्रगीत ः जन गण मन, राष्ट्रीय पक्षी ः मोर, राष्ट्रीय प्राणी ः वाघ, राष्ट्रीय खेळ ः हॉकी, राष्ट्रीय फूल ः कमळ आणि राष्ट्रीय खाद्यपदार्थ ः ? नाही ना माहिती. खरं सांगायाचं झालं तर मलाही माहिती नाही आणि असा कुठलाच खाद्यपदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून निश्‍चित झालेला नाही. पण माझं मत विचाराल तर पुरीभाजी, पाणीपुरी किंवा सामोसा हे तीन पदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून मान्यताप्राप्त होण्यास अडचण नाही.
महाराष्ट्रातील बाभळेश्‍वर (जि. नगर) येथील एका टपरीपासून ते भारताच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या गुवाहाटीतील (आसाम) एका हातगाडीपर्यंत सर्वच ठिकाणी चहा आणि कॉफीप्रमाणे मिळणारा खाद्यपदार्थ म्हणजे पुरीभाजी आणि सामोसा!वेगवेगळ्या कारणांनी भारताच्या विविध भागांमध्ये गेल्यानंतर अगदी सहजपणे आणि स्वस्तात उपलब्ध होणारे दोन पदार्थ अशी पुरीभाजी आणि सामोसा यांची ओळख करुन द्यावी लागेल.

भारताच्या कोणत्याही भागात गेल्यानंतर पंजाबी खाद्यपदार्थ, दाक्षिणात्य पदार्थ, चाट, भेळ आणि पाणीपुरी तसेच चायनीज खाद्यपदार्थ मिळतात. पण तरीही त्यांची ओळख विशिष्ट राज्यापुरती किंवा विशिष्ट राज्यांपुरतीच आहे. भेळ हा आणखी एक पदार्थ या स्पर्धेत उतरु शकला असता. पण भारतातील सर्वच ठिकाणी भेळ मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर हैद्राबादमध्ये सहजासहजी भेळ मिळत नाही. अगदी एखाद-दोन ठिकाणी मिळते. त्यामुळे भेळ हा पदार्थ यादीत घेऊ नये, असं मला वाटतं.

पुरीभाजी, पाणीपुरी व सामोसा या पदार्थांची ओळख एखाद्याच राज्यापुरती मर्यादित नाही. ते काही महाराष्ट्रीयन नाहीत, दाक्षिणात्य नाहीत वा पंजाबीही नाहीत. पण तरीही भारतभर हे पदार्थ अगदी सहजपणे मिळतात, म्हणूनच त्या पदार्थांना "राष्ट्रीय' म्हणावेसे वाटते. अभिजीत कांबळे नावाच्या माझ्या मित्राचं लग्न नगर जिल्ह्यातील बाभळेश्‍वर जवळच्या एका गावात होतं. त्या निमित्तानं बाभळेश्‍वरला मुक्कामाची संधी मिळाली. त्यावेळी सकाळी टपरीवर चहा पिण्याच्या हेतूनं गेलो. पाहतो तर काय चहावाला मस्त पुरीचा घाणा काढत होता. त्याला म्हटलं भाजी कोणती आहे. तेव्हा नवाच प्रकार पहायला मिळाला. कांदा-बटाट्याची परतून केलेली भाजी (डोसा) त्यानं डिशमध्ये घेतली आणि त्यावर झणझणीत तर्री असलेली मटकीची उसळ अक्षरशः ओतली. वेगळ्या डिशमध्ये पुरी देऊन माझ्यासमोर ठेवत म्हटलं "घ्या साहेब'.

नाही म्हटलं तरी पुण्या-मुंबईतल्या हॉटेलांमध्येही पुरीभाजी मिळतेच की. "पुरीभाजी'ची "ऑर्डर' दिली की पुरीसोबत येते बटाट्याची परतून केलेली भाजी आणि पातळ भाजी हवी असेल तर "ऑर्डर' द्या "कुर्मापुरी'ची. नाशिकपासून ते नागपूरपर्यंत आणि औरंगाबादपासून ते सोलापूरपर्यंत पुरीभाजी किंवा कुर्मापुरी मिळत नसलेलं हॉटेल शोधून सापडणं अवघड!

हैद्राबादमध्ये असताना तशी सगळीकडेच पुरीभाजी मिळायची. पण आमचा एक ठरलेला चाचा होता. त्याच्याकडे कांदा, बटाटा, टॉमेटो व इतर काही अगम्य भाज्या घालून "कुर्मा'सारखी भाजी केलेली असायची. थोडीशी आंबट चव (चिंचेमुळे) असलेली भाजी चवीला काही निराळीच! अगदी उडुपी दुकांनांमधून वा रस्त्यांवरील गाड्यांवरही पुरीभाजीची विक्री व्हायची. पाच रुपयांमध्ये चार पुऱ्या आणि "अनलिमिटेड' भाजी. तिकडं बटाट्याच्या परतून भाजीची बात नश्‍शे. एक-दोन दुकांनांमध्ये "डोसाभाजी'ची रस्साभाजी मिळायची. पण खरं सांगांयचं तर एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा ती रस्सा "डोसाभाजी' खायची इच्छाच झाली नाही.

मध्य आणि उत्तर भारतात भोपाळ, ग्वाल्हेर, झॉंशी, मथुरा, आग्रा आणि खुद्द दिल्लीतही अगदी सक्काळी सक्काळी भरपेट नाश्‍ता करण्याची पद्धत आहे. गरमा-गरम दूध, जिलेबी आणि पकोडे या नाश्‍त्याच्या सोबतीला स्टॉलवर किंवा हॉटेलांमध्ये मिळते ते पुरीभाजी! तिथली भाजीही रस्सा भाजीकडे झुकलेली आणि पुऱ्या आकाराला अंमळ मोठ्या व भटुऱ्याच्या जवळ जाणाऱ्या. चना-भटुरा हा देखील पुरीभाजीच्याच जवळ जाणारा आणखी एक खाद्यपदार्थ. गुजरातेतही सुरत, भरुच, बडोदा, अहमदाबाद आणि राजकोटवासियांनाही हा पदार्थ नवीन नाही. सुरतची पुरीभाजी तर अगदी सुप्रसिद्ध होती. आता इतरही पदार्थ आल्यानं तिची लोकप्रियता घटली असावी.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गुवाहाटीला जाणं झालं व पश्‍चिम बंगाल तसंच आसाममध्येही हा पदार्थ अगदी सहजपणे मिळत असल्याचं स्पष्ट झालं. हावडा स्टेशनसमोर असलेल्या छोट्या टपरीवजा हॉटेलवर सकाळी पुऱ्यांचा घाणा निघत असतो. गुवाहाटीमध्ये सकाळी चहाबरोबर नाश्‍त्याला पुरीभाजी तसंच सामोसा हे दोन पदार्थ हमखासपणे मिळतात. इतकंच काय तर एका अण्णाच्या हॉटेलवरही पुरीभाजीचा "मेन्यू'मध्ये समावेश असल्याचं दिसतं. चव मात्र, अगदी आपल्या महाराष्ट्रात मिळते तशीच!
तमिळनाडू आणि केरळमध्ये जाणं झालं नाही, पण आमचा दाक्षिणात्य मित्र देविदास देशपांडे यानं सांगतिलेल्या माहितीनुसार केरळ आणि तमिळनाडूतही पुरीभाजी अगदी सर्रास उपलब्ध असते. फक्त तिकडं पुऱ्या मैद्याच्या असतात. पण त्यात काही विशेष नाही आसाम, बंगाल आणि अगदी हैद्राबादेतही पुऱ्या मैद्याच्याच असतात. तसंच केरळ आणि तमिळनाडूत भाजीमध्ये धने पावडर मोठ्या प्रमाणावर वापरलेली असते. त्यामुळं तिथल्या भाजील जराशी निराळी चव असते. मेघालयाची राजधानी शिलॉंगमध्येही पुरीभाजी मिळते. (अधिका माहिती म्हणजे तिकडं तिथं वडापाव देखील मिळतो.)

पाणीपुरी पण स्पर्धेत...
पाणीपुरी न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सापडलीच तर ती व्यक्ती संशोधानाचा विषय होऊ शकते. पाणीपुरीला काही ठिकाणी (विशेषतः उत्तर भारतात) गोलगप्पे म्हणून संबोधलं जातं. पण नाव बदललं म्हणून चव बदलत नाही. शिजवलेल्या वाटाण्याचा किंवा हरभऱ्याचा रगडा, पुदीना आणि मिरचीच्या ठेच्यापासून बनविलेलं तिखट पाणी तसंच चिंच आणि गूळ यांच्यापासून बनविलेलं आंबटगोड पाणी यांचं अफलातून मिश्रण म्हणजे पाणीपुरी. आता भारतातल्या काही भागात फक्त तिखट पाणीच पाणीपुरीमध्ये टाकलं जातं. तर काही ठिकाणी पाणीपुरी खाताना बरोबर बारीक चिरलेला कांदा दिला जातो. पाणीपुरी मिळाल्यानंतर काही शौकिन कांदा टाकून आस्वाद घेतात.
पाणीपुरी देण्याची पद्धतही औरच असते. बहुतांश ठिकाणी प्लेटनुसार पाणीपुरी दिली जाते व प्लेटमधील पाच, सहा किंवा आठ पुऱ्या संपल्यानंतर विक्रेता आपल्याला एक प्लेट झाल्याची सूचना देतो. त्यानंतर हवी असेल तर दुसरी प्लेट सुरु करतो. गुजरातमध्ये अनेक भागात आपण पुरे म्हणेपर्यंत विक्रेता आपल्या प्लेटमध्ये पुऱ्या ठेवत असतो. तिकडे प्लेटची बात नसतेच. आपण जितक्‍या पुऱ्या खाऊ त्याचे तो आठ आण्याप्रमाणे पैसे आकारतो. आहे की नाही गंमत.

... आणि सामोसाही!
सामोश्‍याबद्दल तर काहीच बोलायला नको. हा पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात मिळतो. त्यातही इराण्यांच्या दुकानात मिळणारा सामोसा थोडासा निराळा. त्याच्या सारणात कोबीचा भरणा अधिक. इतर ठिकाणच्या सामोश्‍यात बटाटा आणि मटार (किंवा वाटाणा) यांची मक्तेदारी. आता काही ठिकाणी पट्टीचे सामोसेही मिळू लागले आहेत. पण त्यात फारसा दम नाही. सारण कमी आणि चावण्याचेच श्रम जास्त.
तुम्हाला काय वाटतं कोणता पदार्थ भाराताच राष्ट्रीय खाद्यपदार्थ बनण्यास अधिक पात्र आहे. या तीनपैकी एखादा पदार्थ असावा की आपल्या मतानुसार आणखी एखादा पदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ बनण्यास लायक आहे. तुमची प्रतिक्रिया "कॉमेंट्‌स'मध्ये नक्की लिहा.

Monday, August 13, 2007

लक्षात राहणारी गटारी...

पळा पळा... लवकर पळा... पटकन गाडी काढ रे... उगाच लटकायचो... चल पळ लवकर... अशी वाक्‍य एखाद्या पत्रकाराच्या तोंडून कधी ऐकली आहेत का? थोडंसं मजेशीर वाटतं ना? हो पण असं घडलंय. ऐन गटारीच्या मुहूर्तावर रात्री एक वाजता...

स्थळ बाबा भिडे पुलाजवळील खाद्यपदार्थांचे स्टॉल. दृश्‍य नेहमीचेच म्हणजे सुमारे शंभर ते सव्वाशे टेबलांवर खाण्यासाठी किंवा कॉफी पिण्यासाठी जमलेले नागरिक. अचानक पोलिसांची गाडी येते. कोणालाही कल्पना नसताना टेबलवर जेवत बसलेल्या ग्राहकांवर पोलिसांचा लाठीमार सुरू होतो. या अनपेक्षित धक्‍क्‍यामुळं सारे ग्राहक जेवण सोडून पळत सुटतात. त्याचवेळी ऑफिसची काम आटोपून कॉफी पिण्यासाठी खडकेच्या स्टॉलवर जमलेल्या पत्रकारांनाही पळण्यावाचून पर्याय नसतो. फुकटच एखादी काठी आपल्यावर पडली तर काय घ्या!

खाया-पिया कुछ नही ग्लास तोडा बारा आना' अशी अवस्था होण्याच्या आत पळ काढलेला बरा नाही का?यानिमित्ताने पोलिसांचा माज अनुभवण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. केवळ ग्राहकांवर लाठीमार करुन ही मंडळी थांबली नाहीत. तर त्यांनी जेवणाची टेबलंही लाथाडली. होत्याचं नव्हतं करुन टाकलं. पुन्हा इथं दिसला तर याद राखा, अशा थाटात धमकाविण्यास त्यांनी सुरवात केली. दहशतीच्या दहा ते बारा मिनिटांमध्ये सारा परिसर मोकळा झाला. एव्हाना स्टॉलधारकांचे काही हजार "गटारात' गेलेले असतात अन्‌ पोलिसांची "गटारी' साजरी झालेली असते.

गेल्या अनेक वर्षांपासून भिडे पुलाशेजारी (झेड पुलाखाली) खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू आहेत. रात्री उशिरा अगदी दीड वाजेपर्यंत हे स्टॉल सुरू असतात. त्यानंतर पोलिसांची गाडी येते आणि हळूहळू स्टॉल बंद होण्याची प्रक्रिया सुरू होते. हा इथला गेल्या कित्येक वर्षांपासूनचा अनुभव. पोलिस आल्यानंतर प्रथम स्टॉलधारकांना समजावून सांगतात आणि तरीही त्यांनी ऐकले नाही, तर त्यांच्यावर कारवाई करतात. ग्राहकांवर कारवाई करण्याची घटना आतापर्यंत घडलेली नव्हती. मात्र, गटारी अमावास्येच्या निमित्ताने काल ही कसरही भरून निघाली. रात्री "कर्तव्या'वर असलेले पोलिस अधिकारी आणि दोन-तीन हवालदार असा ताफा जीपमधून उतरला आणि त्यांनी पुढे मागे न पाहता टेबलांवर बसलेल्या ग्राहकांवर थेट लाठ्या उगारल्या. इतके करून ते थांबले नाहीत, तर शेवटपर्यंतची टेबल पायाने लाथाडली आणि लाठीमारही सुरूच ठेवला.

""तुम्ही माझ्यावर कारवाई करा पण ग्राहकांवर लाठीमार करू नका. आमच्या पाठीवर मारा पण पोटावर मारु नका,'' अशी विनंती स्टॉलधारकांनी केली; पण संबंधित अधिकाऱ्याने कोणालाच जुमानले नाही. ""गस्तीला येणाऱ्या बाकीच्या अधिकाऱ्यांचे मला माहिती नाही; पण मी राऊंडला आलो, की असेच होणार,'' असे प्रत्युत्तर "त्या' अधिकाऱ्याने दिले.आतापर्यंत अशी घटना कधीच घडलेली नसल्यामुळे भांबावलेले ग्राहक आपापल्या गाड्या घेऊन निघून जातात. त्यानंतर आपली काहीही चूक नसल्याची जाणीव झालेल्या स्टॉलधारकाचा आवाज चढतो. त्यासरशी त्याच्याशी संवाद मध्येच तोडून पोलिसांचा ताफाही निघून जातो.

मात्र त्याचवेळेस नदीकाठच्या रस्त्यांवर मोटारींमध्ये बसून मद्यप्राशनाचा आस्वाद लुटणाऱ्या शौकिनांकडे कर्तव्यावरील पोलिसांचे साधे लक्षही गेलेले नसते. आहे की नाही कमाल? एरवी चिकन किंवा मटण हाणून साजरी होणाऱ्या गटारीपेक्षा ही गटारी चांगलीच लक्षात राहणारी ठरली...

Thursday, August 09, 2007

खाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये


कडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊन जाते. अनेकदा सुरवात कशानं करावी, हे देखील समजत नाही. फक्त गुजराती जेवताना अशी परिस्थिती होत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. कारण तुम्ही गुजराती खाद्यपदार्थांच्या एखाद्या दुकानात गेला तर विविध खाद्यपदार्थांच रेलचेल व एकाच पदार्थाचे विविध प्रकार पाहिल्यानंतर गुज्जू भाईंच्या आस्वादक वृत्तीचा प्रत्यय येईल.

काही कारणानिमित्तानं बडोदा (वडोदरा) इथं जाणं झालं. तशी धावतीच भेट झाली. पण तरीही आवर्जून वेळ काढून टिपिकल गुजराती पदार्थ मिळणाऱ्या बडोद्यातील एखाद्या दुकानात भेट देणं ओघानं आलंच. प्रतिष्ठित अलकापुरी भागातील "पायल' नावाचं दुकान विशेष लोकप्रिय असल्याचं समजलं आणि थेट दुकान गाठलं. एका दुकानाचे तीन भाग करुन एका भागात गरमागरम ताजे पदार्थ, दुसऱ्या भागात खारा माल आणि तिसऱ्या बाजूला गोड पदार्थ असं विभागणी करुन येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाच्या आवडी-निवडीची काळजी घेण्यात आली होती.

लज्जतदार खाकरे...
पाच पंचवीस प्रकारचे खाकरे, पन्नास प्रकारच्या आणि जाडीच्या शेव, स्पेशल गुजराती मठिये, विविध प्रकारचे वेफर्स आणि चिवडे अशी जवळपास शे-सव्वाशे रकाने नुसत्या खाद्यपदार्थांच्या "व्हरायटी'ने भरलेले होते. खाकरा म्हणजे पापडाच्या जाडीची कडक पुरी. लसण शेव, पालक शेव, मेथी शेव, लसण-पालक, पालक-मेथी आणि मेथी-लसण अशा विविध चवींमध्ये शेव उपलब्ध होते. हेच प्रकार जाड शेव, बारीस शेव, गाठी शेव अशा स्वरुपातही उपलब्ध होते. खाकऱ्याचीही गोष्ट काही वेगळी नव्हती. लसूण घातलेला, न घातलेला, पालक, मेथी व इतर अनेक चवींमधील खाकरे ग्राहकांची आशेनं वाटत पाहत होते. यांच्या जोडीला बटाट्याचा आणि मक्‍याचा चिवडा, केळ्याचे नि बटाट्याचे तिखट-बिनतिखट वेफर्स अगदी तय्यारीत होते.

चविष्ट मठिये...
मठिये हा खास गुजराती पदार्थ गुजराती तसंच बिगर गुजराती ग्राहकांचंही आकर्षण होता. गुजरातीत मटकीला मठ असं म्हणतात. त्यामुळं मटकीच्या पिठापासून केलेल्या पाणीपुरीच्या आकाराइतक्‍या तिखट-मिठाच्या पुऱ्या म्हणजे मठिये. तिखट-मीठ असूनही थोडे गोडाकडं झुकणारे मठिये तोंडाला वेगळीच चव देणारे आहेत.

सुरळीची वडीही...
ताज्या पदार्थांमध्येही सुरळीची वडी, साधा आणि तिखट ढोकळा, सॅंडविच ढोकळा, तिखट कचोरी, उपवासाची कचोरी, बटाट्याचे पॅटिस, पंजाबी सामोसा, इटुकला-पिटुकला सामोसा, आलू वडा (म्हणजे आपल्या बटाटा वड्याच्या जवळपासही न फिरकणारा पदार्थ) आणि पालक, मेथी, कांदा तसंच बटाटा भजी... इतकं वैविध्य पाहिल्यानंतर पटकन सांगता येईल काय खायचं आणि काय नाही ते! या सर्व पदार्थांबरोबर मिळणारी ढोकळ्याच्या चुऱ्यापासून बनविलेली हिरवी चटणी खासच. नुसती चटणीही तितकीच चांगली. आणि हो एक राहिलंच की, गुजरातची खासियत म्हणजे गरमागरम फाफडा. डाळीच्या पिठापासून तयार केलेला आकाराने लांबडा पदार्थ. गरमागरम चटणीसह खायला एकदम उत्तम.

फुल्ल खादाडी...
अर्थात गुजराती माणसाला किंमतीकडं पाहून खरेदी करण्याची सवय नसल्यानं पदार्थांच्या किंमतीही थोड्याशा चढ्याच. पण पदार्थ खाल्ल्यानंतर पैसा वसूल. त्यामुळं जादा पैसा गेल्याचं दुःख नाही. शेवची भाजी, गाठीची भाजी, शेव टॉमेटो भाजी हे पदार्थ अस्सल गुजराती. आपल्याकडं जशा वडापावच्या गाड्या असतात, तशा तिथं शेवऊसळच्या गाड्या सकाळपासून रात्रीपर्यंत असतात. वाटाण्याची उसळ, वरुन शेव आणि सोबतीला पुरी किंवा पाव ही गुजराती लोकांची आवडती डिश!

मसाला डोसा आणि इतर दाक्षिणात्य पदार्थ, भेळ, रगडा पॅटिस आणि पाणीपुरीसह चाटचे विविध प्रकार, पंजाबी डिशेस, चायनीज खाद्यपदार्थ यांच्या गाड्यांचीही रेलचेलही आपल्याला रस्त्यारस्त्यांवर दिसते. त्या गाड्यांभोवती असलेली तुडुंब गर्दी पाहिली की गुज्जू लोकांच्या "तबियत का राज' समजतं. पण हे सारं आपल्याकडंही अगदी मुबलक प्रमाणात मिळत असल्यानं तिकडं फिरकण्याचा प्रश्‍नच नव्हता.

भरुचनी सेंग...
रेल्वेनं येताना भरुच नावाचं स्टेशन लागतं. हे ठिकाण खारे शेंगदाणे आणि फुटाणे यांच्यासाठी प्रसिद्ध! मुंबईहून जाताना नर्मदा नदीवरील जवळपास दीड किलोमीटर लांबीचा पूल ओलांडला की गाडी थेट भरुच स्थानकात घुसते. तिथं स्टेशनवर किंवा आपण मोटारीनं जात असलो की "हायवे'वर असंख्य विक्रेते आपल्यापुढं खारे शेंगादाण्याचे पुडे घेऊन उभे असतात. त्यातही दोन-तीन प्रकार आहेत. लहान, मध्यम आणि मोठ्या आकारावरुन शेंगादाण्याच्या किंमती ठरतात. मध्यम आकाराचा शेंगादाणाही भलताच मोठा असतो. किलोला साधारण 80 ते 100 रुपये पडतात.

भरुचमध्ये शेंगादाणे पिकत नाहीत. ते येतात सौराष्ट्राहून. पण भरुचचे कारागिर उत्तम असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं इथले खारे शेंगादाणे अधिक प्रसिद्ध आहेत. मोठाल्या कढईतील रेतीमध्ये भाजण्याच्या आदल्या रात्री हे शेंगदाणे रात्रभर खाऱ्या पाण्यात भिजवून ठेवले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते चांगले भाजले जातात आणि त्यावेळी पुन्हा त्यावर खाऱ्या पाण्याचा शिडकावा केला जातो. त्यामुळं भरुचच्या शेंगादाण्यांची चव अगदीच न्यारी वाटते. रोज भरुचमध्ये जवळपास 20 टन शेंगादाणे सौराष्ट्र आणि दक्षिण भारतातून भरुचमध्ये येतात. थोडा माल "एक्‍सपोर्ट' होतो आणि काही माल भारताच्या इतर भागांमध्ये पाठविला जातो. पण बाकी सारा माल भरुच आणि गुजरातमध्येच खपतो.